Tuesday, October 8, 2024

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न

 *संघ शक्ती युगे युगे !!!*

*🔴अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न ....*🟡

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

*➡️हिंगोली अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अधिवेशन व शिक्षक नायक स्वर्गीय अरुण भाई दोंदे व सुलभाताई यांचा स्मृतिदिन समारंभ कार्यक्रम महावीर भवन हिंगोली येथे संपन्न झाला.*

 *स्व.अरुण दोंदे व स्व.सुलभाताई दोंदे यांच्या स्मृतीस राज्यभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले यानंतर विषय नियमक समितीच्या ठरावानुसार माजी राज्याध्यक्ष श्री प्रकाश भाई दळवी यांच्या अध्यक्षतेखाली  सल्लागार श्री.सुरेश भावसार व श्री. विश्वनाथ सूर्यवंशी यांचे त्रीसदस्य निवड समितीने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्य कार्यकारिणीची  पुढील तीन वर्षासाठी घोषणा केली*


*⏺️*राज्याध्यक्ष पदी - श्री देविदास बसवदे (नांदेड)*

*⏺️ राज्य सरचिटणीस- कल्याण लवांडे (अहिल्यानगर)*

*⏺️कार्याध्यक्ष- अण्णाजी आडे (चंद्रपूर )*

*⏺️*कोषाध्यक्ष -श्रीमती विनयश्री पेडणेकर(सिंधुदुर्ग)*

*यांची फेरनिवड करण्यात आली.*

*उर्वरित राज्य कार्यकारणी पुढील प्रमाणे*

*🟡महिला विभाग प्रमुख -श्रीमती उर्मिला बोंडे (चंद्रपूर )*

*⏺️वरिष्ठ उपाध्यक्ष -श्री किरण पाटील (अमरावती)*

*🔴विभाग प्रमुख-*

*कोकण विभाग- श्री प्रमोद पाटील (रायगड)*

*पुणे विभाग -श्री दीपक भुजबळ (सातारा)*

*नाशिकविभाग- श्री भगवान पाटील (नंदुरबार)*

*अमरावती विभाग- श्री दिगंबर जगताप (यवतमाळ )*

*मराठवाडा विभाग श्री सुनील हाके (लातूर )*

*नागपूर विभाग श्री केशव बुरडे (भंडारा)*

*🔴उपाध्यक्ष-*

*श्री.म.ल.देसाई(सिंधुदुर्ग)*

*श्री.व्हि.डी .देशमुख(हिंगोली)*,

 *श्री अनिल महाजन (पुणे)*

*श्री हरिदास घोगरे (बीड )*

*श्री विजय मनवर (वाशिम)*

 *श्री.लालासाहेब मगर (धाराशिव)* 

*श्री.शिवानंद सहारकर -(नागपूर)*

*⏺️कार्यालयीन चिटणीस -श्री महेश देशमुख (ठाणे)*

*उपसरचिटणीस- सौ. संध्या ठाकरे (अमरावती)*

*🔴संयुक्त सचिव- श्री रवींद्र काकडे (जालना )*

*श्री.कृष्णा चिकणे (रत्नागिरी )*

*श्री विलास आळे( चंद्रपूर)* *श्री.प्रशांत पारकर (सिंधुदुर्ग)*

 *श्री.परमेश्वर बालकुंदे (लातूर )*

*सौ.माया ताई चाफले (वर्धा)*

 *श्री राजेंद्र निमसे (अहिल्यानगर)*

*कु.संगीता पागृत(अमरावती)*

*श्री.डी.एस.कोल्हे(हिंगोली)*

*श्री.दिलीप देवकांबळे (नांदेड)*

*सौ.शुभांगी कचरे (यवतमाळ)*

*🔴संघटक- श्री राजा कविटकर (सिंधुदुर्ग )*

*सौ .पद्मशाली डी एम (हिंगोली )*

*श्री.शांताराम पाटील (धुळे )*

*श्री.बाळासाहेब कदम (अहमदनगर )*

*सौ.कांचन कडू (अमरावती )*

*सौ .सविता पिसे (चंद्रपूर )*

*श्री.गुरुदास कुबल (सिंधुदुर्ग)*

*सौ.आशाताई झिल्पे(नागपूर)*

*श्री .जयवंत काळे (नांदेड)*

 *सौ ज्योती कुर्डुणकर (रायगड)*

*श्री.विजय पंडीत (न.पा.रत्नागिरी)*

*श्री.किशोर चौधरी (नंदुरबार)*

*श्री.संतोष लोहार (सातारा)*

*🔴हिशोब तपासणीस-*

*श्री.लोकेश गायकवाड (भंडारा)*

 *फारुक बेग (नांदेड)*


 *या प्रमाणे कार्यकारणी बिनविरोध निवडण्यात आली.*

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

  *कल्याण लवांडे*

*सरचिटणीस*

*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*

विषय नियामक समितीची(राज्य कार्यकारणीची निवडीबाबत) सभा

 प्रति ,      २८/०९/२०२४

मा राज्य पदाधिकारी जिल्हा/नपा संघाचे अध्यक्ष सरचिटणीस व विषय नियामक समिती सदस्य

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ

*⏺️ विषयः विषय नियामक समितीची(राज्य कार्यकारणीची निवडीबाबत) सभा*

मा.महाशय,

वरील विषयी आपणास  कळविण्यात येते की, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्य कार्यकारणीची निवडीसंबधी विषय नियामक   सभा शनिवार

 *▶️दि.५/१०/२०२४ रोजी*

 *▶️वेळःसायं -ठीक ७:००वा.*

राज्य संघाचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री.देविदास बस्वदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सन्मानीय सल्लागार यांचे प्रमुख उपस्थितीत

*🔴ठिकाण-महावीर भवन, हिंगोली ता.जि.हिंगोली*

 येथे आयोजित केली आहे तरी सभेस  राज्य पदाधिकारी , जिल्हा /नपा संघाचे अध्यक्ष सरचिटणीस व जिल्हा संघाने आपल्या तीन वर्षाच्या  वार्षिक वर्गणीच्या सरासरी निहाय प्राधिकृत केलेले सदस्य  यांनी   उपस्थित रहावे ही विनंती..

➡️सभेपुढील विषयः

१)स्वागत व प्रस्ताविक

२)स्थायी समिती सभेचे इतिवृत्त वाचन करणे

३)राज्य कार्यकारणीची निवडीसाठी निवड समितीची विषय नियामक सभेच्या संमतीने निवड करून निवडीचे अधिकार बहाल करणे.

४)अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्य कार्यकारीणी निवडीबाबत आवश्यकता भासल्यास (प्रमुख पदांची)प्रत्यक्ष निवडणूक घेणे.

५)अध्यक्षांच्या परवानगीने येणारे विषय.

   तरी आपण सदरील बैठकीस उपस्थित राहून सहकार्य करावे ही विनंती.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

   आपला विश्वासू,


   *कल्याण लवांडे*

*सरचिटणीस*

*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*

Monday, October 7, 2024

मो.वा उर्फ दादासाहेब दोंदे

 

 




आज ७ ऑक्टोबर........

शिक्षकांचे पंचप्राण कै.मो.वा उर्फ दादासाहेब दोंदे यांची पुण्यतिथी....

प्राध्यापक गंगाधर आहिरे सर यांनी

 दादासाहेब तथा आचार्य मो. वा. दोंदे यांच्या कार्याचा घेतलेला आढावा...

🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅


   २० व्या शतकातील प्रबोधनाच्या चळवळीत महाराष्ट्रातील अनेक शिलेदार अधोरेखित आहेत. आचार्य मो. वा. दोंदे हे त्यापैकीच एक. त्यांचे संपूर्ण नांव मोरेश्वर वासुदेव दोंदे.दादासाहेब या आदरयुक्त उपाधीने ते परिचित राहिलेले आहेत. समाज उन्नतीच्या ध्यासातून त्यांनी हयातभर समाजकार्य केलं. ते मुळचे ठाणे जिल्ह्यातील. ४ ऑगस्ट १८९४ ही त्यांची जन्म तारीख. विल्सन काँलेजमधून १९१५ साली, त्यांनी बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण केली. तळागाळातील माणसांपर्यत शिक्षण प्रवाहीत व्हावे, त्यातून सुजाण नागरिक घडावे ही त्यांची मनोधारणा होती. नामदार गोपाळ क्रुष्ण गोखले यांंची विचारश्रुष्टी व प्राचार्य टी. ए. कुलकर्णी यांच्या अथक कर्तृत्वातून, गोखले एज्युकेशन सोसायटीची स्थापन झालेली होती. त्या संस्थेच्या मुंबईतील परळच्या आर.एम.भट हायस्कूलमध्ये आचार्य दोंदे यांनी शिक्षकीपेशा स्वीकारला. १९२८ ते १९५४ या काळात त्यांनी उपरोक्त शाळेत प्राचार्यपद उपक्रमशीलतेनं सांभाळलं. गो.ए. सोसायटीच्या विविधांगी शैक्षणिक कार्यात त्यांनी महत्वपुर्ण योगदान दिलेलं होतं.


    आचार्य दोंदे सर हे तत्कालीन महाराष्ट्रातील शिक्षकांच्या विविध समस्यांशी कर्तव्यभावनेनं जोडलेले होते. १९४५ साली त्यांनी भारतीय स्तरावर तमाम प्राथमिक शिक्षकांची संघटना उभारली. त्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्यासाठी, त्यांनी शिक्षकांचा अभूतपूर्व संप घडवून आणला होता. संपाच्या परिणामातून शिक्षकांच्या मुलभूत मागण्यांंची दखल, स्वातंत्र्यपूर्व इंग्रज राजवटीतील सरकारला घ्यावी लागलेली होती. त्या शिक्षक संघटनेची पहिली मागणी होती, शिक्षकांचा पगार हा १५ रुपयावरून ३० रुपये झाला पाहिजे. ती मागणी तत्कालीन सरकारला मान्य करावी लागली होती. शिक्षकीपेशा आणि शिक्षणकुळाशी, ते समर्पित व्रुतीने तादात्म्य पावलेले होते. त्यांनी अव्याहतपणे शैक्षणिक कार्यात स्वताला झोकून दिलेलं होतं. सेवानिव्रूतीच्या निमित्ताने त्यांना प्राप्त झालेलं उत्पन्नही, त्यांनी विविध शाळांना दान म्हणून दिलेलं होतं. उपरोक्त नोंंदी त्यांच्या संदर्भातील लिखितात उपलब्ध आहे.


    आचार्य दोंदे यांचे १९३० ते ६४ या कालावधीतील सार्वजनिक क्षेत्रातील कर्तुत्व, आजच्या वर्तमानातही प्रेरक ठरणारं आहे. ते नव्या आचार- विचारांचे धुरीण होते. परिणामी त्यांची तत्कालीन समाज बदलाच्या जडणघडणीत, सामीलकी राहिल्याचे निदर्शनास येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तनाच्या चळवळीचे ते क्रुतीशील समर्थक होते. त्यातून द्वयींंचेे कौटुंबिक संबंंध द्रुढ झालेले होते. त्यातूनच बासाहेबांनी आपला मुलगा यशवंत तथा भैय्यासाहेब यांस, दोंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली आर. एम. भट हायस्कूलमध्ये प्रविष्ट केलेलं होतं. बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या 'स्वतंत्र मजूर पक्षात' आणि शैक्षणिक व कामगार चळवळीतही त्यांचे योगदान महत्वपूर्ण राहिल्याचे दिसून येते. आचार्य दोंदे सर, हे प्रभावी वक्ते होते. त्यांचे विवेचन चिंतनगर्भ असे. १९४२ साली डॉ. आंबेडकरांचा जन्मदिवस त्यांच्या अनुयायांनी मुंबईमध्ये आयोजित केलेला होता. त्या समारंभाचे अध्यक्षस्थान दोंदे सरांनी भुषविले होते. "डॉ. आंबेडकरांचे संर्घशमय कार्य हे भारतातील सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनासाठी महत्वपुर्ण ठरते आहे." असे प्रतिपादन त्यांनी त्यावेळी केले होते. १९४८ साली त्यांनी डॉ. आंबेडकर व त्यांच्या सुविद्य सहचारिणी, सविता तथा माईसाहेब आंबेडकर यांचा सत्कार समारंभ आर. एम. भट. हायस्कूलमध्ये घडवून आणला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुुंबईतील 'राजग्रुह' हे निवासस्थान त्यांच्या हजारो दुर्मिळ ग्रथांचे माहेरघर होतं. त्या ग्रंथालयातील पंचवीस हजार ग्रंथांची क्रमवार सूची तयार करण्यात, दोंदे सरांचा मोलाचा सहभाग राहिलेला होता. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या 'पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे' देखील ते विश्वत होते. प्रस्तुत संस्थेेच्या विकासात त्यांची कामगिरी मोलाची ठरलेेेली होती. १४ आँक्टोंबर १९५६ रोजी, बाबासाहेबांनी बुद्धधम्माची नागपुरात दिक्षा स्वीकारली. त्या धर्मांतराचे समर्थन व स्वागत करणारे पत्र, दोंंदे सरांंनी बाबासाहेेबांंना पाठविलेे होतेे.


 ६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांचे निर्वाण झाले. ७ डिसेंबर रोजी मुंबईच्या दादर येथील चैत्यभूमीवर आंदरांजली सभा आयोजित केलेली होती. त्यावेळी कर्मवीर दादासाहेब गायकवाड, प्र. के. अत्रे आणि आचार्य दोंदे यांसह काही मोजक्याच धुरीणांची शोक प्रकट करणारी भाषणं, सदर सभेत झाली होती. त्यावेळी आचार्यांनी अत्यंत भावोत्कट असं मनोगत व्यक्त केलेलं होतं. प्रस्तुत मनोगतातून त्यांनी बाबासाहेबांच्या सहवासातील अनेक आठवणींना उजाळा दिला होता.


   आचार्य दोंदे सर, राजकीय व्यवस्थेकडे सामाजिक सुधारणा करण्याचे माध्यम म्हणून पाहात होते. त्या दृष्टीतून ते राजकारणात सक्रिय होते. त्यांचा लोकसंग्रह अधिक असल्याने ते मुंबई महानगरपालिकेचे अनेक वर्षे सदस्य होते. १९५७-५८ साली ते महापौरपदीही विराजमान झालेले होते. त्यांच्या त्या कार्किदीत त्यांनी अनेक लोकोपयोगी कार्य केलेलं होतं. निस्पृह प्रबोधनकार, आदर्शवत आणि त्यागशील व्रुतीचे शिक्षक, निस्वार्थी राजकारणी व मानवतेचा कैवार क्रुतीशीलतेनं जपणारा एक 'सत्शील माणूस' असे विविध पैलू; आचार्याच्या व्यक्तित्वात सामावलेले होते. या कर्तबगार सुधारकाचे १९६४ साली अकाली निधन झाले. वर्तमानात समाज, शिक्षण आणि राजकारणाच्या क्षेत्रांत, क्रुतीप्रवण असलेल्या उदयोन्मुख मुखंडांना; आचार्य दोंदे सरांचे जीवन व कर्तृत्व मार्गदीप ठरु शकते.

🙏🙏🙏.,.......

Tuesday, August 27, 2024

नँशनल जाँइट कौन्सिल आँफ अँक्शन (एनजेसीए)चे राष्ट्रीय संयोजक मा शिवगोपाल मिश्रा यांची आज दि २४ ऑगस्ट २०२४ रोजी भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी साहेब यांचे सोबत

 🌴🌴🌴🌴🌴

*Education International* 

🟥 *अखिलभारतीय प्राथमिक शिक्षक संघ*


🟩 *नँशनल जाँइट कौन्सिल आँफ अँक्शन (एनजेसीए)चे राष्ट्रीय संयोजक  मा शिवगोपाल मिश्रा यांची आज दि २४ ऑगस्ट २०२४ रोजी भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी साहेब यांचे सोबत*


🟢  *जुनी पेन्शन योजना कार्यन्वित करणे बाबत )*


महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.



🔴 *नँशनल जाँइट कौन्सिल आँफ अँक्शन हे देशस्तरावर कार्यरत संघटनेचे फेडरेशन असून प्राथमिक शिक्षकांची "अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ " ही एकमेव संघटना त्यात सहभागी आहे.*


🟠 *गत वर्षी याच विषयाबाबत १०ऑगस्ट २०२३ मध्ये विशाल मोर्चा रामलीला मैदान , नवी दिल्ली येथे  काढण्यात आला होता.*


🟧 *जून्या पेन्शन बाबत सकारात्मक चर्चा झाली असून  आजच्या बैठकीतील चर्चेनंतर केंद्र शासनाने युपीएस (युनीफाईड पेन्शन स्किम ही नवी पेन्शन  योजनेला मान्यता दिली आहे..*


*🔴अशी असेलनवीन पेन्शन स्किम*---


*⏺️जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान 25 वर्षे काम केले असेल, तर त्याला निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या बेसिक पगाराच्या किमान 50 टक्के पेन्शन नक्कीच मिळेल.*

*जर कर्मचाऱ्याने 10 वर्षांनी नोकरी सोडली तर कर्मचाऱ्यांना 10,000 रुपये पेन्शन मिळेल.*

'

🔴 *सध्या कर्मचाऱ्यांचा 10 टक्के वाटा आहे तर केंद्र सरकारचा 14 टक्के हिस्सा आहे. मात्र यापुढे केंद्र सरकार 18 टक्के हिस्सा असेल.*


🟥 *1 जानेवारी 2004 नंतर रुजू झालेल्या परंतु सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही ही नवीन योजना लागू होईल.*


🟣 *कर्मचाऱ्यांना NPS किंवा UPS यापैकी एक निवडण्याचा पर्याय असेल.*

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️


     🔸 *आपले विनीत*🔸


         *(देविदास बस्वदे )*

           *राष्ट्रीय उपाध्यक्ष )*

  *अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ*

तथा 

       *(राज्याध्यक्ष )*

 *अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*


     *(कल्याण लवांडे )*

       *राज्यसरचिटणीस*

*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*

तथा

         (*विद्यमान संचालक* )  *प्राथमिक शिक्षक बँक , जिल्हा अहमदनगर*


      *Forwarded by*


        *(राजेंद्र निमसे )*

          *राज्यसंघटक* 

*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*

 तथा 

     *(विद्यमान संचालक )*

*प्राथमिक शिक्षक विकास मंडळ : जिल्हा -अहमदनगर*


( ऐक्य मंडळ - अहमदनगर )

🍀🍀🍀🍀🍀🍀


Monday, April 22, 2024

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या पोर्टेबल कार्यालयाचे उद्घाटन

23एप्रिल 2017 रोजी टिटवाळा येथे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या पोर्टेबल कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले.या अविस्मरणीय प्रसंगाची काही क्षणचित्रे......💐💐💐



Wednesday, April 3, 2024

आम्हाला शिकवू द्या....लक्षवेधी धरणे आंदोलन

प्रति, 
मा.ना.एकनाथरावजी शिंदे साहेब,
मुख्यमंत्री ,महाराष्ट्र राज्य.

मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब,
उपमुख्यमंत्री ,महाराष्ट्र राज्य.

मा.ना.श्री.गिरीश महाजन साहेब,
ग्रामविकासमंत्री, महाराष्ट्र राज्य.

मा.ना.श्री.दिपक केसरकर साहेब,
शालेय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य.

मा.श्री.रणजितसिंग देओल साहेब, (भा.प्र.से)
प्रधान सचिव 
शालेय शिक्षण व क्रिडा विभाग , महाराष्ट्र राज्य.

मा.राजेशकुमार साहेब(भा.प्र.से)
 प्रधान सचिव ग्रामविकास विभाग
महाराष्ट्र राज्य.

विषयः"आम्हाला शिकवू द्या"या प्रमुख मागणीसह शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी"लक्षवेधी धरणे आंदोलन"

मा.महोदय, 
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ ही प्राथमिक शिक्षकांची सर्वात जुनी शिक्षक संघटना असून अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाशी संलग्न असणारी महाराष्ट्रातील एकमेव शिक्षक संघटना आहे.अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ ही देशभरात जवळपास २४ राज्यात काम करणारी प्राथमिक शिक्षकांची संघटना असून शिक्षकांच्या हक्का बरोबर  विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी काम  करते.संघटनेविषयी अधिक माहिती www.aiptfindia.org  या संघटनेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
         शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ उपोषण, मोर्चे , धरणेआंदोलन तसेच निवेदन आदिच्या माध्यमातून शासनांचे लक्ष वेधत आहे.
     शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. तसेच शिक्षकांना शिकविण्याच्या कामांसाठी वेळ कमी मिळत असून शाळाबाह्य कामात शिक्षकांना अधिक वेळ जात आहे त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष आहे."आम्हाला  शिकवू द्या " या प्रमुख मागणीसह शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्याप्रश्नांची सोडवणूक लवकरात लवकर करण्यात यावी यासाठी मा.जिल्हाधिकारी साहेब यांच्या  माध्यमातून  अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक स़ंघ जिल्हा शाखा-............आपणांकडे विनंती करत आहे.शिक्षकांना न्याय मिळावा ही विनंती.

   *⏺️प्रमुख मागण्या⏺️*
१) जुनी पेन्शन योजना लागू करा.
२)शिक्षणसेवक योजना  रद्द करुन नियमित शिक्षकांची नेमणूक करा.
३)नवीन शैक्षणिक धोरणातील शिक्षक व शिक्षण विरोधी तरतुदी काढून टाकाव्यात .(जसे समुह शाळा योजना, शिक्षकांऐवजी स्वंयसेवक नेमण्यास परवानगी, पुर्वप्राथमिक वर्गासाठी ट्रेन शिक्षक न नेमणे )
४) सातव्या वेतन आयोगाचा खंड -२ प्रकाशित करुन सर्व तरतुदी लिगू कराव्यात.
५) शिक्षकांकडील सर्व अशैक्षणिक कामे  कमी करावी.
६) शिक्षकांची जिल्हातंर्गत बदलीप्रक्रीया तातडीने राबविण्यात यावी.
७) ९  सप्टेंबर २०१९ चे ग्रामविकास विभाग, मुंबई यांचे परिपत्रकानुसार शिक्षकांना मुख्यालयी राहण्याबाबत ग्रामसभेचा ठराव बंधनकारक चे परिपत्रक रद्द करून मुख्यालयी राहण्याची अट शिथिल करण्यात यावी .
८) शिक्षकांना तीन लाभांची आश्वासीत प्रगती योजना लागू करावी.
९)शिक्षकांच्या अर्जित रजेचे रोखीकरण करण्यात यावे.
१०) MSCIT वसुली थांबवून प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी.
११) प्राथमिक शिक्षक ,पदवीधर, केंद्रप्रमुख तसेचशिक्षण विभागातील प्रशासकीय पदे तात्काळ भरण्यात यावी.
१२) शालेयपोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेमार्फत राबवण्यात यावी. 
१३) सर्व विषय शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्यात यावी.
१४) शिक्षकांकडील आँनलाइन कामे कमी करून, त्यासाठी प्रत्येक केंद्रात डेटा एन्ट्री आँपरेटर नियुक्त करण्यात यावा.
१५) अप्रशिक्षीत शिक्षकांचा शिक्षण सेवक पदावर व्यतीत कालावधी वरीष्ठ वेतनश्रेणी साठी ग्राह्य धरण्यात यावा.
१६) शिक्षकांच्या पुरवणी देयकांसाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात यावे.
   तरी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या व प्रश्नांची शासनस्तरावर योग्य दखल घेवून न्याय मिळावा ही विनंती.

आपले विश्वासू,


   अध्यक्ष           सरचिटणीस
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ , जिल्हा शाखा -सातारा

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्र व्यापी आंदोलन...

, *@संघशक्ती युगे युगे!!*
*अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्र व्यापी आंदोलन...*
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
 *अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षकांच्या विवध प्रश्नांसाठी  व न्यायसंगत मागण्यासाठी राष्ट्रव्यापी आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.देशभरातील २४ राज्यात हे आंदोलन विविधस्तरावर संपन्न होत आहे .या आंदोलनाचे साक्षीदार बनूया.*
   *शिक्षकांना आचार्यापासून आचारी बनवणारी व्यवस्था तसेच  विद्यार्थ्यांपासून दूर नेवून अशैक्षणिक कामात गुंतवणारी प्रशासकीय यंत्रणेला आता आम्हाला एकच मागणी करायची "आम्हाला शिकवू द्या"*
      *शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी  आम्ही कटीबद्ध असू, परंतू आम्हाला आपली साथ हवी. विविध टप्प्यावर होणाऱ्या आंदोलनात आपण सहभागी व्हावे ही अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची विनंती..🙏🏻*
*१०० वर्षापेक्षा जास्त इतिहास असणारी अखिल महाराष्ट्र. प्राथमिक शिक्षक संघ ही संघटना आहे. त्यानंतर अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना ७ जानेवारी १९५४ साली याच महाराष्ट्राच्या भूमीत झाली. या देशस्तरावरील संघटनेशी फक्त अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ ही एकमेव महाराष्ट्रातील शिक्षक संघटना संलग्न आहे. स्व.दादासाहेब दोंदे यांनी देशभरातील शिक्षकांना एकत्र करुन शिक्षकांच्या आत्मसन्मना साठी पहिला  लढा दिला. गुरुजींचा १५  रु.पगार ३० रू.झाला. स्व.अरुण दोंदे यांनी दिल्ली येथील शिक्षक संघाच्या अधिवेशनात फक्त शिक्षकांसाठी चटोपाध्याय आयोग लागू करुन घेतला.शिक्षकांच्या पाल्यांना मोफत शिक्षण, कुटुंब निवृत्ती वेतन अशा कितीतरी बाबी संघाच्या एकजुटीने शिक्षकांना मिळाल्या.*
    *आपल्या असंघटित पणाचा फायदा घेवून भुतकाळात लढ्याने मिळालेल्या सुविधा शासन हिरावून घेतंय. जुनी पेन्शन गेलीय,शिक्षक  शिक्षणसेवक झाला आहे.आता काहींची वक्रदृष्टी आपल्या वेतनावर आहे.शासकीय शाळांच्या खाजगीकरणाचा हा डाव आहे.विद्यार्थी गुणवत्तेसाठी आपण कटीबद्ध असू पण 'आम्हाला शिकवू द्या' ही शासन प्रशासनाला निक्षून सांगण्याची ही वेळ आहे.*
     *"लोग कहते है, आंदोलन, प्रदर्शन, और जुलूस निकालनेसे क्या होता है....??*
     *इससे ये सिद्ध होता है की, हम जीवीत है, अटल है और मैदान से हटे नही है!* प्रेमचंद   
     *शिक्षकांना  समाजात आजही मानाचे स्थान आहे.कोट्यावधी रूपयांचा लोकसहभाग समाजाकडून जमा करून शाळेच्या भौतिक सुविधा शिक्षकांनी पुर्ण केल्या आहेत.हे त्याचे द्योतक आहे.याविषयी कधी कोणत्याही लोकप्रतिनिधीनी कौतुकांची थाप शिक्षकांच्या पाठीवर टाकली नाही.तर शिक्षकांविषयी द्वेषभावना पसरवण्याचे पातक काही मंडळी करतांना दिसत आहेत. असं म्हटलं जातं "एका पिढीने दुस-या पिढीकडे सुसंस्कृतीचा वारसा संक्रमित करण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण होय." शिक्षकांचा द्वेष करण्याचा वारसा लोकप्रतिनिधी म्हणून आपण पुढील पिढीला देणार आहात का???*

   त्यामुळे आपल्या संघटीत प्रयत्नातून शिक्षण व्यवस्थेचे मुलभूत प्रश्न सोडवण्यासाठी  तसेच बालकांच्या व शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी सज्ज होऊ या!!
        
      *⏺️आंदोलन कार्यक्रम⏺️*
*१) स्वाक्षरी मोहीम ः दि३१ आँगस्ट पर्यत ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली .व यानंतर ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी महामहीम राष्ट्रपती, मा.पंतप्रधान , व राज्याच्या मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले .*
टप्पा -२
*२)२४ सप्टेंबर २०२२ रोजी प्रत्येक जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी कार्यालययेथे   एकदिवशीय थरणे आंदोलन.*
टप्पा ३
*३) राज्यस्तरावर धरणे आंदोलन ः.माहे नोव्हेंबर २०२२ मध्ये राज्य स्तरावर एकदिवशीय धरणे आंदोलन*
टप्पा-४
*४)  राष्ट्रव्यापी आंदोलनः जानेवारी २०२३ मध्ये नवी दिल्ली येथे  जंतरमंतर येथे धरणे आंदोलन.*

   *⏺️प्रमुख मागण्या⏺️*
१) जुनी पेन्शन योजना लागू करा.
२)शिक्षणसेवक योजना  रद्द करुन नियमित शिक्षकांची नेमणूक करा.
३)नवीन शैक्षणिक धोरणातील शिक्षक व शिक्षण विरोधी तरतुदी काढून टाकाव्यात .(जसे समुह शाळा योजना, शिक्षकांऐवजी स्वंयसेवक नेमण्यास परवानगी, पुर्वप्राथमिक वर्गासाठी ट्रेन शिक्षक न नेमणे )
४) सातव्या वेतन आयोगाचा खंड - प्रकाशित करुन सर्व तरतुदी लिगू कराव्यात.
५) शिक्षकांकडील सर्व अशैक्षणिक कामे  कमी करावी.
६) ९  सप्टेंबर २०१९ चे ग्रामविकास विभाग, मुंबई यांचे परिपत्रकानुसार शिक्षकांना मुख्यालयी राहण्याबाबत ग्रामसभेचा ठराव बंधनकारक चे परिपत्रक रद्द करून मुख्यालयी राहण्याची अट शिथिल करण्यात यावी .
७) शिक्षक जिल्हातंर्गत बदलीप्रक्रीया तातडीने राबविण्यात यावी.
८) शिक्षकांना तीन लाभांची आश्वासीत प्रगती योजना लागू करावी.
९)शिक्षकांच्या अर्जित रजेचे रोखीकरण करण्यात यावे.
१०) MSCIT वसुली थांबवून प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी.
११) प्राथमिक शिक्षक ,पदवीधर, केंद्रप्रमुख तसेचशिक्षण विभागातील प्रशासकीय पदे तात्काळ भरण्यात यावी.
१२) शालेयपोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेमार्फत राबवण्यात यावी. 
१३) सर्व विषय शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्यात यावी.
१४) शिक्षकांकडील आँनलाइन कामे कमी करून, त्यासाठी प्रत्येक केंद्रात डेटा एन्ट्री आँपरेटर नियुक्त करण्यात यावा.
१५) अप्रशिक्षीत शिक्षकांचा शिक्षण सेवक पदावर व्यतीत कालावधी वरीष्ठ वेतनश्रेणी साठी ग्राह्य धरण्यात यावा.
१६)सर्व मुलांना शालेय गणवेश देण्यात यावा.
१७) राज्य पातळीवरून शिक्षणाचे धोरण ठरवावे. जिल्हा किंवा तालुका पातळीवर कोणतेही समांतर कार्यक्रम/ उपक्रम  राबवले जाऊ नयेत.तसेच शाळेत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची संख्या मर्यादित असावी.
१८) नक्षलग्रस्त आणि आदिवासी  व दुर्गम भागातील शिक्षकांना प्रोत्साहन भत्ता आणि एकस्तरीय वेतन श्रेणीचा लाभ देण्यात यावा .
१९)नगरपालिका ,महानगर पालिका शिक्षकांना शंभर टक्के वेतन अनुदान हे शासनाकडून नियमितपणे देण्यात यावे .
२०)शाळांसाठी मोफत इंटरनेट सुविधा, वीजबील, पाणी पट्टी इ.साठी निधी उपलब्ध करुन द्यावा.
२१)शालेय स्तरावरील विविध समित्याचे पुनर्गठन करुन शाळास्तरावर फक्त शाळाव्यवस्थापन समितीच असावी.
२२)जिल्हा/राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना पूर्वीप्रमाणे वेतनवाढी देण्यात याव्यात.
२३)वस्ती शाळा शिक्षकांची सेवा 2001 पासून कायम  धरून तेव्हा पासूनचे वस्तीशाळा शिक्षकांना पूर्वलक्षी प्रभावाने वित्तीय लाभ मिळावेत.
२४) प्राथमिक शिक्षकांनी धारण केलेल्या उच्च अर्हता उदा : पीएचडी , एम एड ,एम ए ( एज्यूकेशन ) साठी शिक्षण सेवा वर्ग -१, वर्ग - २ मध्ये किंवा अन्य पदांवर पदोन्नती व मर्यादित विभागीय परीक्षा अथवा सरळ सेवा परीक्षेद्वारा पात्र होण्यासाठी कालबाह्य झालेला महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवा प्रवेश नियम -१९६७ तसेच शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी यांच्याही सेवाप्रवेश नियमात सुधारणा करण्यात करावी .

२५) शाळांना मिळणारे अनुदानासाठी असणाऱ्या बँका या एकच ठेवण्यात याव्यात.कायम  बँका बदलण्याचा प्रकार थांबविण्यात यावा .
२६)शिक्षकांच्या पुरवणी देयकांसाठी अनुदान उपलब्ध करुन द्यावे.
   तरी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या व प्रश्नांची शासनस्तरावर योग्य दखल घेवून न्याय मिळावा ही विनंती.

आपले विश्वासू,


*देविदास बस्वदे    कल्याण लवांडे*
*अध्यक्ष           सरचिटणीस*
*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न

 *संघ शक्ती युगे युगे !!!* *🔴अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न ....*🟡 ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ *➡️हिंगोली अखिल...