Saturday, September 3, 2022

निश्चयाचे महामेरू

 

* *निश्चयाचे महामेरू शंकरराव विठ्ठल भुजबळ (अप्पा ) यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 💐💐🎂🎂💐💐🌹🌹 
आज 84व्या वर्षात पदार्पण करत आहेत. 
-शंकरराव विठ्ठल भुजबळ जन्म -4/9/1939 सर्जापूर ता .जावली  जिल्हा सातारा. मातृछत्र वयाचे 7व्या वर्षी हरपले पितृछत्र वयाचे 14 वे वर्षी हरपले.अप्पांना एक छोटा भाऊ आहे वय 75आहे.आमचे एकत्र कुटूंब आहे.  एक विवाहित मुलगी, तीन विवाहित मुले,सुना  व नातवंडे , परतुंड असे मोठे सुखी समाधानी कुटूंबाचे प्रमुख अप्पा🙏 माझ्या आईचे 24_1_2018 रोजी निधन झाले ही पोकळी कधीच भरून येणार नाही.  🙏 अप्पांचे  शिक्षण कोंडवे येथे सहावी पर्यत _ 7वी नगरपालिका शाळा नंबर 1 येथे  _ज्युनिअर व सिनियर ट्रेड महात्मा फुले काॅलेज व दहावी बाहेरून वयाचे 16 वर्षी शिक्षक नोकरी मिळवली. कारण उत्तम मजबूत शरीर 18 वर्ष वय लागते नोकरी करणेसाठी त्यांनी तसा दाखला त्यावेळी civil surgeon यांचेकडून मिळवला.रयत मध्ये 1955ते1957 नोकरी केली.चोरगेवाडी व पिलाणी वरची तालुका जिल्हा सातारा येथे ,नंतर आवश्यक ते प्रशिक्षण घेऊन 1959 ते 1997 लोकल बोर्ड सातारा व सातारा जिल्हा  परिषद मध्ये नेले, किडगाव, नुने, गवडी, कोंडवे ,कळंबे मुख्याध्यापक म्हणून  कृष्णानगर व नेले याठिकाणी उत्तम नोकरी केली सेवेत असताना कधीच पुरस्कार, मेडीकल बील यासाठी अर्ज केला नाही.Scout या विषयावर प्रभुत्व आजही अनेक विद्यार्थी त्यांचें नांव काढतात.सुंदर अक्षर, उत्तम शरीर, क्रिडा, गायन, वादन, वाचन, प्रवास, पाककला, भाषण करणे व एखादी गोष्ट ठरविलेनंतर कोणत्याही दबावाला, संकटाना न घाबरता पूर्ण करणे या जमेच्या बाजू . काॅलेज मध्ये असताना मित्रांबरोबर सुरू केलेली पंढरपूरची आषाढी वारी गेली 63वर्ष अखंड सुरू आहे.माझे आजोबांचे आयुष्य 45 वर्ष त्यांनी 45 वर्ष पुण्यतिथी कार्यक्रम केला .दरवर्षी उत्तम गायक व वादक व महाप्रसाद बेंदराच्या   दुसर्या   दिवशी ही परंपरा आम्ही पुढे चालवली आहे.ते शेती उत्तम करत सेवानीवृती नंतर शेतात पाऊल ठेवला नाही कारण जबाबदारी दिल्याशिवाय समोरचा माणूस समर्थ होत नाही.अप्पांनी आम्हांला शिक्षणासाठी पैसा कमी पडू दिला नाही परंतु pocket money कधीच दिला नाही.आयुष्यात कपडे नेहमीच पांढरा सदरा, पायजमा, व टोपी यात बदल नाही.रेडिओ, टी व्ही, मोबाईल, जागा , बंगला अशी खरेदी नाही.त्यांचे तत्व माणसाने गरजा मर्यादित ठेवाव्यात म्हणजे  समाधान लाभते.साधी रहाणी उच्च विचारसरणी याचे आचरण त्यांनी केले करत आहेत.पद व प्रसिद्धी, स्तुती प्रत्येकाला आवडते अप्पा त्यापासून दूर परंतु आव्हान स्विकारणे  व पार पाडणे हा त्यांचा स्वभाव 1977ते 1979 ते शिक्षक बॅक संचालक दोन वेळेस निवडून आले तेही अपक्ष अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ आचार्य दादासाहेब दोंदे प्रणित संघटनेत   माझे आजोबा, वङील व मी काम केले.करत आहोत यापुढे करत रहाणार.कारण माझे आजोबांना सुरवातीला 5 रूपये पगार होता मला आता 92 हजार रूपये पगार आहे.तो संघटनेमुळेच हे विसरून चालणार नाही.अप्पांनी जिल्हा उपाध्यक्ष, सरचिटणीस, राज्य संघटक, संयुक्त चिटणीस ही पदे भूषविली. आता अखिल सातारा जिल्हा सेवानिवृत्त संघाचे अध्यक्ष आहेत. याकाळात अनेक आंदोलन केली.संप मोर्चे यात सक्रिय सहभाग घेतला.अधिवेशनाला शेकडो शिक्षकांना सहकुटूंब बरोबर घेऊन गेले भारत दर्शन घडविले अनेक जण  आदराने नाव काढतात शंकरराव भुजबळ यांचे मुळे आम्हाला हे शक्य झाले.मीही त्यांचा वसा घेऊन वारसा चालवत आहे.भारत दर्शन बरोबरच 9देश सहकारी सहकुटूंब पाहिले आहेत.वडिलांचे म्हणणे आपण इतिहास, भूगोल शिकवतो आपण प्रत्यक्ष ठिकाणे पाहिलेस ज्ञानात भर पडते.अध्यापन करताना फायदा होतो.त्यांनी जमा खर्च कधी लिहला नाही भावाला तीन मुलांना किंवा नातवांना एक रूपाया आजपर्यंत मागितला नाही किंवा हिशोब विचारला नाही.आमच्या पंखांना बळ दिले स्वातंत्र्य दिले हे खूपच मोठे काम केले.शिस्त व दरारा कायम आहे आजही घराला कुलुप नसते.कधीच चोरी झाली नाही कारण पुस्तकाशिवाय त्यांनी कांहीच खरेदी केले नाही.संत शिरोमणी सावता माळी पुण्यतिथी, ज्ञानेश्वरी पारायण, जय हनुमान ज्येष्ठ नागरिक संघ, पेन्शनर वेलफेअर फंड, अंबाई सहकारी पाणीपुरवठा संस्था या कार्यक्रमात नेहमीच पुढाकार घेतला.त्यांचे संस्कारामुळेच आमचे एकत्रीत कुटूंब सुखात व समाधानात आहे. आजही रोज मोटारसायकल सुरूच आहे. लोकांना भेटले की त्यांना ऊर्जा मिळते.त्यांनी आयुष्यात नको ते खरेदी केली नाही त्यामुळे रद्दी व भंगार विकले नाहीं.माणसे मिळवली यापुढील आयुष्य लोकसेवा करणेसाठी आहे असे प्रतिपादन करतात.माझे वडिल हे माझे गुरू आहेत मार्गदर्शक आहेत आदरणीय,वंदनीय🙏 आहेत.यापुढील आयुष्य आरोग्यदायी जावो हीच ईश्वर चरणी विनम्र प्रार्थना🙏 अखिल सातारा प्राथमिक शिक्षक संघ 🙏🙏🙏 

No comments:

Post a Comment

जनगणना संदर्भात निवेदन...

अखिल सातारा शिक्षक संघाच्या वतीने जनगणनेसंबंधाने जिल्हाधिका-यांना निवेदन....          सध्या सुरु असलेल्या भारताची जनगणना २०२६ - २०२७ च्या अन...