Wednesday, December 10, 2025

केंद्रीय शिक्षा मंत्री मा.श्री.धर्मेंद्र प्रधान यांची अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट..

 





*🟣केंद्रीय शिक्षा मंत्री मा.श्री.धर्मेंद्र प्रधान यांची अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट*

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

*🟥नवीदिल्ली: अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय शिक्षण मंत्री माननीय श्री धर्मेंद्र प्रधान यांची आज दि.१०/१२/२०२५ रोजी त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली व टिईटी अनिवार्यतेतून शिक्षकांना  वगळण्यासाठी संशोधन बील केंद्र शासनाने संसदेत मांडावे यासाठी निवेदनाद्वारे मागणी केली.*

*🟣यावर मा.शिक्षणमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून याबाबत लवकरच योग्य तो निर्णय केंद्र सरकार घेईल असे अश्वासन प्रतिनिधी मंडळास दिले.*

*🟥प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व उत्तर प्रदेश चे विधानपरिषद  सदस्य मा.श्री.देवेंद्र प्रताप सिंह यांनी केले .समवेत अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बसवराज गुरीकर, ज्युनिअर हायस्कूल शिक्षक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.योगेश त्यागी ,उत्तर प्रदेश प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मा.श्री.विनय तिवारी, राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्री.उमाशंकर सिंह जी यांचेसह   पदाधिकारी उपस्थित होते.*

 *☸️अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने जंतरमंतर येथे केलेल्या आंदोलनाचे तसेच सर्व संसद सदस्यांना दिलेल्या निवेदनाचा परीणाम स्वरूप संसदेच्या दोन्ही सभागृहात टिईटी मुद्दा गाजत आहे .*

*🌀अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिकाही दाखल केलेली आहे.*

*टिईटी प्रश्नी शिक्षकांनालवकरच  योग्य तो न्याय मिळेल असा आशावाद राष्ट्रीय अध्यक्ष श्री.बसवराज गुरीकर यांनी व्यक्त केला असून शिक्षकांनी कोणत्याही  प्रकारची  काळजी करू नये  अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ शिक्षक हितासाठी सदैव तयार आहे.*


🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 *☸️ श्री.देविदास बस्वदे -राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा प्रदेशाध्यक्ष*

*🌀कल्याण लवांडे-राज्य सरचिटणीस*

  *अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*

Wednesday, November 26, 2025

जंतरमंतर वर देशभरातील हजारो शिक्षकांचा सहभाग..

 🌴🌴🌴🌴🌴


*🟣 टीईटी व जुनी पेन्शनच्या मागणीसाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे धरणे अंदोलन...*


*जंतरमंतर वर देशभरातील हजारो शिक्षकांचा सहभाग.*

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️🌺🌺


*🟥नवी दिल्ली- टीईटी अनिवार्यतेसंबधी झालेले नवीन संशोधन रद्द करून शिक्षण अधिकार कायदा लागू होण्या पूर्वीच्या शिक्षकांना सेवेत संरक्षण द्यावे तसेच जुनी  पेन्शन योजना लागू करावी या दोनच मागण्यांसाठी देशभरातील हजारो शिक्षकांनी दिल्लीतील ऐतिहासिक जंतरमंतर वर धरणे आंदोलन केले.*


*🌀एक सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांच्या पात्रतेविषयी दिलेल्या निकालात दोन वर्षात ज्यांची पाच वर्षापेक्षा अधिक सेवा शिल्लक आहे त्यांना टीईटी अनिवार्य केली .*


*➡️भारत सरकारने यात हस्तक्षेप करून शिक्षकांच्या  सेवेचे संरक्षण पदांचा सन्मान व सुरक्षितता ठेवावी ,सेवाशर्ती च्या आधारे झालेल्या निवडी कायम ठेवावी, अशी मागणी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष  देविदास बस्वदे यांनी केली.*


*🌀यावेळी बोलतांना राष्ट्रीय महासचिव कमलाकांत त्रिपाठी यांनी सांगितले की नियुक्ती नंतर पात्रता परिक्षा पुन्हा इतर कोणत्याही कर्मचाऱ्यांना लागू नाही , मग ती फक्त शिक्षकांनाच का?*

*जे टीईटी पात्र आहेत त्यांना पेन्शन नाही.ज्यांना पेन्शन आहे ते टीईटी नाही म्हणून त्यांना नोकरीतून शासन काढत आहे .या शासनाच्या परस्परविरोधी भूमिकेचा  त्यांनी निषेध केला.*


*🟣 फेब्रुवारी 2026 मध्ये रामलीला मैदानावर आक्रोश मोर्चा ,संसदेचा करणार घेराव-*

*या बाबत केंद्रसरकारने गंभीरपणे दखल घेतली नाही तर येत्या फेब्रुवारी महिन्यात संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान संसदेचा घेराव करण्याचा इशारा राष्ट्रीय अध्यक्ष बसवराज गु र्रीकर यांनी दिला.*


*आंदोलनानंतर देशाचे शिक्षणमंत्री मा.धर्मेंद्र प्रधान यांना संघटनेच्या शिष्टमंडळाने मागण्याचे निवेदन दिले.*

*आमदार देवेंद्र प्रताप सिंह (उ.प्र) तसेच अँड .विक्रम हेगडे यांनी आंदोलन कर्त्यांना संबोधित केले.*


 *या आंदोलनात राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे , संयुक्त सचिवराजेंद्र निमसे, संघाचे जिल्हा नेते संजय शेळके, ऐक्यमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रदिप चक्रनारायण, अखिल पदवीधर संघाचे जिल्हाध्यक्ष रज्जाक सय्यद, जिल्हा सरचिटणीस सर्जेराव ससाणे, श्रीगोदा संघाचे तालुकाध्यक्ष नंदू गायकवाड  आदी पदाधिकारी अहिल्यानगर जिल्ह्यातून सहभागी झाले होते.*

*************************

        

     *आ स्नेहांकित*


       (*कल्याण लवांडे* )     

       *राज्य सरचिटणीस*


       *(राजेंद्र निमसे )*

        *राज्य संयुक्तसचिव*

*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*

☘️☘️☘️☘️☘️

Sunday, November 16, 2025

चलो दिल्ली !चलो दिल्ली!! चलो दिल्ली!!

 






*🟣चलो दिल्ली !चलो दिल्ली!! चलो दिल्ली!!*


*टिईटी व जुनी पेन्शन प्रश्नी जंतरमंतरवर अखिल भारतीय प्राथमिक शिक्षकसंघाचे २४नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन....*

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

*मा.सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर २०२५ रोजी टिईटी अनिवार्यते संबधी दिलेला निर्णय समस्त शिक्षकांना व्यथित करणारा तसेच त्यांनी आतापर्यंत केलेल्या अनुभव सिध्द कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा व शिक्षक संवर्गाचे अस्तित्व मिटवणारा आहे.*


*🌀या निर्णयाच्या विरोधात अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने २५ सप्टेंबर रोजी शिक्षक संघटनेच्या वतीने पहिली पुनर्विचार याचिका दाखल केली असून वेगवेगळ्या पाच याचिका संघटना दाखल करत आहे .या संबधी कायदे तज्ञांचा सल्ला संघटना घेत आहे.विविध राज्यांनीही याचिका दाखल केल्या असून देशभरातील समस्त शिक्षक वर्ग न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.*


 *असे जरी असले तरी न्यायालयीन लढाई बरोबरच आंदोलनाचा मार्ग अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने अवलंबला आहे .कारण ही लढाई दिसते तेवढी सोपी नाही.*

*🌀मा.पंतप्रधान, केंद्रीय शिक्षणमंत्री तसेच प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्री यांना संघटनेच्या वतीने शासनाने हस्तक्षेप करावा यासाठी प्रत्येक राज्यातून एकाच वेळी निवेदन दिले.लोकप्रतिनिधी यांच्या भेटी घेवून येणाऱ्या अधिवेशनात या प्रश्नी आवाज उठवावा अशी विनंती करण्यात येत आहे.त्याचबरोबर देशभरातील लाखो शिक्षकांची स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली आहे.*


*🟣आता २४नोव्हेंबर रोजी देशभरातील शिक्षक प्रातिनिधिक लक्षवेधी धरणे आंदोलन देशाची राजधानी दिल्ली येथील ऐतिहासिक जंतरमंतर वर करणार आहेत.शासनाने आरटीई कायदा लागू होण्यापूर्वी च्या शिक्षकांना टिईटी मधून सुट मिळावी यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात यावी ही प्रमुख मागणी असेल तसेच जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या दोनच प्रश्नांसाठी धरणे आंदोलन करण्यात येत आहे. .या आंदोलनाचा आपण भाग होऊन या आंदोलनात सहभाग नोंदवा ही विनंती.*

*☸️ठिकाण:जंतरमंतर ,नवी दिल्ली*

*☸️वेळः सकाळी १०ते ३:३०वा.पर्यंत*

*अधिकार की लढाई मे निमंत्रण नही भेजे जाते,जिसका जमीर जिंदा है वो खुद समर्थन मे आ जाते है*.. !

▪️▪️▪️

*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा*

TET आणि जुनी पेन्शन संदर्भात आंदोलन दिल्ली...

 







*🟣चलो दिल्ली !चलो दिल्ली!! चलो दिल्ली!!*


*टिईटी व जुनी पेन्शन प्रश्नी जंतरमंतरवर अखिल भारतीय प्राथमिक शिक्षकसंघाचे २४नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन....*

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

*मा.सर्वोच्च न्यायालयाने  एक सप्टेंबर २०२५ रोजी टिईटी अनिवार्यते संबधी दिलेला  निर्णय समस्त शिक्षकांना व्यथित करणारा तसेच त्यांनी आतापर्यंत केलेल्या अनुभव सिध्द कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा व शिक्षक संवर्गाचे  अस्तित्व मिटवणारा आहे.*


*🌀या निर्णयाच्या विरोधात अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने २५ सप्टेंबर रोजी  शिक्षक संघटनेच्या वतीने पहिली पुनर्विचार याचिका दाखल केली असून वेगवेगळ्या पाच याचिका संघटना दाखल करत आहे .या संबधी कायदे तज्ञांचा सल्ला संघटना घेत आहे.विविध राज्यांनीही याचिका दाखल केल्या असून  देशभरातील समस्त शिक्षक वर्ग न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.*


 *असे जरी असले तरी न्यायालयीन लढाई बरोबरच आंदोलनाचा मार्ग अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने अवलंबला आहे .कारण ही लढाई दिसते तेवढी सोपी नाही.*

*🌀मा.पंतप्रधान, केंद्रीय शिक्षणमंत्री तसेच प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्री यांना संघटनेच्या वतीने शासनाने हस्तक्षेप करावा यासाठी प्रत्येक राज्यातून एकाच वेळी निवेदन दिले.लोकप्रतिनिधी यांच्या भेटी घेवून येणाऱ्या अधिवेशनात या प्रश्नी आवाज उठवावा अशी विनंती करण्यात येत आहे.त्याचबरोबर देशभरातील लाखो शिक्षकांची स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली आहे.*


*🟣आता २४नोव्हेंबर रोजी देशभरातील शिक्षक प्रातिनिधिक लक्षवेधी धरणे आंदोलन देशाची राजधानी दिल्ली येथील ऐतिहासिक जंतरमंतर वर करणार आहेत.शासनाने आरटीई कायदा लागू होण्यापूर्वी च्या शिक्षकांना टिईटी मधून सुट मिळावी यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात यावी ही प्रमुख मागणी असेल तसेच जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या दोनच प्रश्नांसाठी धरणे आंदोलन करण्यात येत आहे. .या आंदोलनाचा आपण भाग होऊन या आंदोलनात सहभाग नोंदवा ही विनंती.*

*☸️ठिकाण:जंतरमंतर ,नवी दिल्ली*

*☸️वेळः सकाळी १०ते ३:३०वा.पर्यंत*

*अधिकार की लढाई मे निमंत्रण नही भेजे जाते,जिसका जमीर जिंदा है वो खुद समर्थन मे आ जाते है*.. !

▪️▪️▪️

*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा*

Sunday, October 12, 2025

टिईटी TET प्रश्नी जंतरमंतरवर 24नोव्हेंबर रोजी धरणे

 *🟡चलो दिल्ली....*

*टिईटी प्रश्नी जंतरमंतरवर 24नोव्हेंबर रोजी धरणे....*

*अखिल भारतीय  प्राथमिक शिक्षक संघाचा निर्णय....*




▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

*🟥नवी दिल्ली ः अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारी मंडळाचे ऑनलाइन सभा 12 ऑक्टोबर 2025 रोजी राष्ट्रीय अध्यक्ष बसवराज गुर्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेत काही महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली.*

*🟣 टीईटी प्रश्नी व जुनी पेन्शन योजनेसाठी 24 नोव्हेंबरला जंतरमंतरवर करणार धरणे आंदोलन--🌀*

*एक सप्टेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने सेवेत असणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी ज्यांची सेवा ५वर्षापेक्षा जास्त शिल्लक आहे त्यांना तसेच पदोन्नतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केली आहे .दोन वर्षात परीक्षा उत्तीर्ण  न झाल्यास सेवा मुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निकाल माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.*

*याविरुद्ध संघटनेने पुनर्विचार याचिका तारखेला आहे .त्याचबरोबर विविध आंदोलनाच्या माध्यमातून शासन प्रशासनावर दबाव निर्माण करण्यात येत आहे.*

*या विरोधात आंदोलनाचं हत्यार संघटनेने उपसले आहे.टिईटी प्रश्न व जुनी पेन्शन योजना या दोनच विषयावर 24 नोव्हेंबर रोजी देशभरातील जवळपास 25 हजार  प्राथमिक शिक्षक जंतर-मंतरवर दोन दिवसीय धरणे आंदोलन करणार आहेत..*

*🟣फेब्रुवारी मध्ये होणार जेलभरो....*

*यानंतर संसदेच्या फेब्रुवारी मध्ये होणाऱ्या अधिवेशन कालावधीत देशभरातील लाखो शिक्षक संसदेला घेराव घालून जेलभरो आंदोलन करणार आहेत.*

*➡️यापूर्वी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने मा.पंतप्रधान व मा.केंद्रीय शिक्षणमंत्री यांना तसेच मुख्यमंत्री यांना याप्रश्नी शासनाने हस्तक्षेप करावा म्हणून निवेदन दिले आहे.व राज्य भर स्वाक्षरी मोहीम राबवली.*

*🌀अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ जो पर्यंत शिक्षकांना न्याय मिळत नाही. तो पर्यत हा लढा सर्व पातळीवर लढेल असे राष्ट्रीय महासचिव कमलाकांत त्रिपाठी यांनी यावेळी बोलतांना सांगितले.*

*यावेळी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राज्याध्यक्ष देविदास बस्वदे राष्ट्रीय सचिव तथाराज्य कोषाध्यक्षा  विनय पेडणेकर राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे यांची उपस्थिती होती.*

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

*कल्याण लवांडे*

*राज्य सरचिटणीस*

*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*

Monday, October 6, 2025

आचार्य मोरेश्वर वासुदेव दोंदे..

 *आचार्य मोरेश्वर वासुदेव दोंदे* 





२० व्या शतकातील प्रबोधनाच्या चळवळीत महाराष्ट्रातील अनेक शिलेदार अधोरेखित आहेत. आचार्य मो. वा. दोंदे हे त्यापैकीच एक. त्यांचे संपूर्ण नांव मोरेश्वर वासुदेव दोंदे. *दादासाहेब* या आदरयुक्त उपाधीने ते परिचित राहिलेले आहेत.  ते मुळचे ठाणे जिल्ह्यातील.४ आँगस्ट १८९४ ही त्यांची जन्म तारीख. विल्सन काँलेजमधून १९१५ साली, त्यांनी बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण केली.  नामदार गोपाळ क्रुष्ण गोखले यांंची विचारश्रुष्टी व प्राचार्य टी. ए. कुलकर्णी यांच्या अथक कर्तृत्वातून, गोखले एज्युकेशन सोसायटीची स्थापन झालेली होती. त्या संस्थेच्या मुंबईतील परळच्या आर.एम.भट हायस्कूलमध्ये आचार्य दोंदे यांनी शिक्षकीपेशा स्वीकारला. १९२८ ते १९५४ या काळात त्यांनी उपरोक्त शाळेत प्राचार्यपद  सांभाळलं.

 मोरेश्वर यांचे ना.म.जोशी यांच्या समाज सेवा संघाच्या कार्यालयात नेहमी जाणेयेणे असे. बाबासाहेबही जोशींच्या कार्यालयात कधीकधी जात असत. त्याच कार्यालयात मोरेश्वर यांची बाबासाहेबांशी भेट झाली. गांधीजींच्या दलितोध्दाराच्या संकल्पनांपेक्षा बाबासाहेबांची ध्येयधोरणं आणि विचार प्रभावी व ठोस असल्याचे मोरेश्वर यांना जाणवले.मोरेश्वर बाबासाहेबांच्या विचारांनी प्रभावित झाले. दलितोध्दारासाठी गांधीजींचा हरिजनोध्दाराचा मार्ग कुचकामी व बेगडी असल्याचे मोरेश्वर यांची पक्की खात्री झाली. ते गांधीजींपासून, त्यांच्या विचारांपासून आणि पर्यायाने काँग्रेसपासून राजकीयदृष्ट्या बाजूला होऊ लागले. त्यांच्या मनावर बाबासाहेबांच्या विचारांचा पगडा बसू लागला. ते काँग्रेस पक्षापासून १९२८ साली कायमचे व पूर्णतः अलिप्त झाले. आता ते जनमानसात ' *दादासाहेब* ' म्हणून जास्त ओळखले जाऊ लागले होते.

 कधी समाज सेवा संघाच्या कार्यालयात, तर कधी बाबासाहेबांच्या कार्यालयात बापूसाहेब सहस्त्रबुद्धे, देवराव नाईक, अनंतराव चित्रे, भास्करराव कद्रेकर, कमलाकांत चित्रे, दत्तात्रय प्रधान, रामचंद्र कवळी आणि दादासाहेब दोंदे यांच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैचारिक गप्पा होऊ लागल्या.

 एव्हाना बाबासाहेब आणि दादासाहेब यांचे संबंध खूपच दृढ झाले होते. त्या दोघांमध्ये कौटुंबिक जिव्हाळा निर्माण झाला होता.

      

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक  संघ ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी शिक्षक संघटना १९१० साली स्थापना झाली .त्याकाळी स्वातंत्र्य चळवळ उभारणे हा एकमेव हेतू होता .मुंबई इलाखा प्राथमिक शिक्षक संघ नावाने संघटनेची स्थापना झाली होती.

सन १९४५ ला मुंबई राज्य प्राथमिक शिक्षक संघ अशी पुनर्रचना करण्यात आली,व पहिंले अधिवेशन पुणे येथे घेण्यात आले ,अध्यक्ष स्थानी संस्थेचे संस्थापक आचार्य दादासाहेब उर्फ मो.वा.दोंदे हे होते.पहिली मागणी शिक्षकांचा पगार १५ रु.वरुन ३० रु.करणे त्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्यासाठी, त्यांनी शिक्षकांचा अभूतपूर्व संप घडवून आणला होता.कर्मवीर भाऊराव पाटील, आचार्य अत्रे यांची साथ संपाला लाभली.  संपाच्या परिणामातून शिक्षकांच्या मुलभूत मागण्यांंची दखल, स्वातंत्र्यपूर्व इंग्रज राजवटीतील सरकारला घ्यावी लागलेली होती. त्यांनी अव्याहतपणे शैक्षणिक कार्यात स्वताला झोकून दिलेलं होतं. सेवानिव्रूतीच्या निमित्ताने त्यांना प्राप्त झालेलं उत्पन्नही, त्यांनी विविध शाळांना दान म्हणून दिलेलं होतं. 

७ जानेवारी १९५४ला अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना नागपूर येथे तत्कालीन प्रधानमंत्री पं.जवाहरलाल नेहरु यांच्या उपस्थितीत झाली.तेव्हापासून दर दोन वर्षाला संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन होते.सन १९६०ला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ या नावाने महाराष्टात संघटनेच नामकरण झालं.


  बाबासाहेबांनी १५ आॅगस्ट १९३६ रोजी ' *स्वतंत्र मजूर पक्षाची* ' स्थापना करीत असल्याची घोषणा केली. त्यांची या पक्षाचे अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली, तर पक्षाचे *उपाध्यक्ष* म्हणून मोरेश्वर वासुदेव अर्थात *दादासाहेब दोंदे* यांची निवड करण्यात आली. त्यावरूनच बाबासाहेबांचे आणि दादासाहेबांचे संबंध किती घनिष्ठ होते याचा प्रत्यय येतो. स्वतंत्र मजूर पक्षाला १९३७ सालच्या मुंबई इलाख्याच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाले.


 बाबासाहेबांनी लिहिलेल्या 'थाॅट्स आॅन पाकिस्तान' या ग्रंथावर मुंबईतील हेमंत व्याख्यानमालेत वागळे हाॅलमध्ये १८ ते २० फेब्रुवारी १९४२ या तीन दिवशी परिसंवाद झाला. या तीनही दिवसातील परिसंवादाचे अध्यक्ष दादासाहेब दोंदे होते.

बाबासाहेब कायदेमंत्री असताना मुंबईतील एका भेटीदरम्यान त्यांनी दादासाहेबांना राष्ट्रीय कामगार आयुक्त म्हणून नियुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

 

बाबासाहेबांनी ८ जुलै १९४५ रोजी मुंबईमध्ये ' *पीपल्स एज्युकेशन सोसायटी (पीईएस)* या शिक्षणसंस्थेची स्थापना केली. संस्थेच्या पहिल्या कार्यकारी मंडळावर निस्पृह आणि विश्वासू असलेले दादासाहेब दोंदे यांची सचिव म्हणून निवड केली. बाबासाहेब जेव्हा मुंबईत येत तेव्हा पीईएसच्या कार्यकारिणीची बैठक होई. या बैठकीला दादासाहेब न चुकता हजेरी लावत.


मास्तरकीच्या नोकरीवर त्यांचे सर्वात जास्त प्रेम होते. मास्तर या शब्दाची व्याख्या ते ' *मायेचे अस्तर पांघरणारा तो मास्तर* ' अशी करीत असत.


बासाहेबांनी आपला मुलगा यशवंत तथा भैय्यासाहेब यांस, दोंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली आर. एम. भट हायस्कूलमध्ये दाखल केलेलं होतं. आचार्य दोंदे सर, हे प्रभावी वक्ते होते. त्यांचे विवेचन चिंतनगर्भ असे. १९४२ साली डॉ. आंबेडकरांचा जन्मदिवस त्यांच्या अनुयायांनी मुंबईमध्ये आयोजित केलेला होता.  त्या समारंभाचे अध्यक्षस्थान दोंदे सरांनी भुषविले होते.  " *डॉ. आंबेडकरांचे संर्घशमय कार्य हे भारतातील सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनासाठी महत्वपुर्ण ठरते आहे* ." असे प्रतिपादन त्यांनी त्यावेळी केले होते. १९४८ साली त्यांनी डॉ. आंबेडकर व त्यांच्या सुविद्य सहचारिणी, सविता तथा माईसाहेब आंबेडकर यांचा सत्कार समारंभ आर. एम. भट. हायस्कूलमध्ये घडवून आणला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुुंबईतील 'राजग्रुह' हे निवासस्थान त्यांच्या हजारो दुर्मिळ ग्रथांचे माहेरघर होतं. त्या ग्रंथालयातील पंचवीस हजार ग्रंथांची क्रमवार सूची तयार करण्यात, दोंदे सरांचा मोलाचा सहभाग राहिलेला होता.

 १४ आँक्टोंबर १९५६ रोजी, बाबासाहेबांनी बुद्धधम्माची नागपुरात दिक्षा स्वीकारली. त्या धर्मांतराचे समर्थन व स्वागत करणारे पत्र, दोंंदे सरांंनी बाबासाहेेबांंना पाठविलेे होतेे.


 ६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांचे निर्वाण झाले. ७ डिसेंबर रोजी मुंबईच्या दादर येथील चैत्यभूमीवर आंदरांजली सभा आयोजित केलेली होती. त्यावेळी कर्मवीर दादासाहेब गायकवाड,  प्र. के. अत्रे आणि आचार्य दोंदे यांसह काही मोजक्याच धुरीणांची शोक प्रकट करणारी भाषणं, सदर सभेत झाली होती. त्यावेळी आचार्यांनी अत्यंत भावोत्कट असं मनोगत व्यक्त केलेलं होतं.


प्रिन्सिपाल मो. वा. दोंदे यांचे मुंबईत नभोवाणीवर बाबासाहेबांच्या वर भाषण झाले.  ते 'नवशक्ति च्या ८ डिसेंबर १९५६ च्या अंकात दुसऱ्या पानावर प्रसिद्ध झाले.

प्राचार्य दोंदे यांनी गुरुवारी मुंबई आकाशवाणी केंद्रावर बाबासाहेबांना आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहाणारे भाषण केले होते‌.त्यात त्यांनी त्यांच्या धर्मांतराच्या तत्त्वज्ञानाची साधकबाधक विचारांची चर्चा केली होती.   


१९५७ च्या  विधानसभा निवडणुकीनंतर मुंबई आणि पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांत संयुक्त महाराष्ट्र समितीला दणदणीत यश मिळाले. त्यावेळी मुंबई महानगरपालिकेत १३१ जागा होत्या. त्यापैकी ७२ जागा समितीला आणि ५७ जागा काँग्रेसला मिळाल्या.

महापौरपदाच्या निवडणुकीत समितीचे उमेदवार आचार्य दोंदे ७७ मते मिळवून विजयी झाले.  


अशा या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तनाच्या चळवळीच्या क्रुतीशील समर्थकाचे ७ ऑक्टोबर सन १९६४ला मुंबईत निधन झाले.


संदर्भ : चांगदेव भवानराव खैरमोडे,भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड १२

डाॅ.बाबासाहेब.आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी.- योगीराज बागुल

Thursday, October 2, 2025

TET आणि अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ

 *संघ शक्ती, युगे युगे*

*टी ई टी व अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ.....*

    *--------------------------------------*



 *4 -ऑक्टोबर 2025 चा महाराष्ट्र मध्यवर्ती शिक्षक संघटनेचा मूक मोर्चा स्थगित करण्यात यश मिळाले. टी ई टी बाबत सुप्रिम कोर्टाच्या निर्णयामुळे आज संपूर्ण देशात रण माजले असतांना व टी ई टी हा सर्व शिक्षकांच्या गळ्यातील फास झाल्यानंतर त्यातून मार्ग काढण्यासाठी सर्व शिक्षक तारणहार म्हणून सर्व संघटनाकडे शिक्षक मोठ्या अपेक्षेनी बघत आहेत. आणि झाले ही तसेच, बऱ्याचश्या संघटना ह्या आपल्या राज्याच्या पुनर्विचार याचिकेची वाट बघतांना दिसतात.*

    *मुकमोर्चा काढायचा म्हटला पण तो स्थागित झाल्यावर त्यावरती पण राज्य संघटना होकार दर्शविल्यानंतर आता शिक्षकांकडून प्रश्न विचारल्या जात आहे.* 

*जर राज्य सरकार कडून* *30 दिवसानंतर न्यायालयात याचिका घातल्यास ती स्वीकार होणार काय?*

*महाराष्ट्र राज्याच्या विरुद्धच निर्णय* *असल्यामुळे पुढे काय*

   अश्या अनेक प्रश्नांमुळे शिक्षक पुर्णतः नैराश्येत आहे.

    आणि त्यामुळेच आज सर्व राज्य संघटना अखिल भारतीय शिक्षक संघाशी जुळवून घेतांना दिसत आहेत. त्यांची स्तुती करत आहेत. कारणही तसेच आहे.

*जिथे मोठ्या- मोठया नी पाठ फिरवली तिथे 25 ते 30 लक्ष रुपये खर्चून सर्व शिक्षकांसाठी टी ई टी विरुद्ध याचिका घालणारी* व *लढणारी एकमेव संघटना म्हणजे अखिल भरतीय प्राथमिक शिक्षक संघटना*.आणि पुढे याच याचिकेवर सर्व कायद्याची बाब सर्वांना लढविणे आहे.

आणि त्यामुळेच सर्व राज्यांना आता देश पातळी पासून ते जिल्ह्या पर्यंत एकच आशेचा किरण आहे.तो म्हणजे

*अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ*

 त्यामुळे सर्वांनी पुढील लढ्यासाठी *अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघांनी पुढील लढ्यासाठी जी हाक दिली त्या हाकेस आपला लढवय्या बाणा दाखवून व निराश न होता सोबत साथ द्यावी हिच नम्र विनंती*.


*शिक्षक हितासाठी सदैव सेवेत*


*अखिल महाराष्ट्र प्राथ शिक्षक संघ महाराष्ट्र*

     *सर्व सन्माननीय शिक्षक बंधू/भगिनींना विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक -हार्दिक शुभेच्छा!!*

  *अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ ...

   🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Friday, September 26, 2025

टिईटी TET exam प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल

 *संघ शक्ती युगे युगे!!*

*शिक्षक एकता जिंदाबाद...*

************************************

 *अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ*

*🟣टिईटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल*

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰


*नवी दिल्ली-देशातील प्राथमिक शिक्षकांना  (१ली ते ८वी) शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करणारा निकाल मा.सर्वोच्च न्यायालयाने १सप्टेंबर २०२५  निर्णयाने दिलेला आहे.यामुळे संपूर्ण शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली असून यामुळे देशभरातील लाखो शिक्षक प्रभावित झालेले आहे.*

*ज्यांची सेवा पाच वर्ष शिल्लक आहे त्यानांच फक्त सूट मिळाली असून बाकी शिक्षकांना दोन वर्षांत टिईटी करणे बंधनकारक केले आहे.*

 *🌀या विषयी अखेल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने मा.पंतप्रधान व मा.शिक्षणमंत्री यांना जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन देवून सदरील प्रकरणी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.तसेच लोकप्रतिनिधी यांना भेटुन निवेदन देण्यात येत आहेत.*


*🟣अखेर २५ सप्टेंबर पुर्वी याचिका दाखल-*

*सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एक महिन्याच्या आत रिव्हिव पिटीशन दाखल होणे आवश्यक असते त्यानुसार दि. २५ सप्टेंबर २०२५रोजी  अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने  मा.सर्वोच्च न्यायालयात "रिव्हिव पिटीशन" दाखल केली  आहे.यासाठी माजी अँटनी जनरल मुकुल रोहतगी तसेच माजी सॉलिसिटर जनरल मा.संतोष हेगडे हे ख्यातनाम वकील शिक्षकाची बाजू मांडणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष बसवराज गुर्रीकर तसेच राष्ट्रीय सचिव कमलाकांत त्रिपाठी यांनी सांगितले आहे.*


*🟣उत्तर प्रदेश शासनानंतर अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची  दुसरी याचिका मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे.यावरून अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ नेहमीच कठीण काळात शिक्षकांसोबत असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.*


*🟠राज्यातील शिक्षकांना आवाहन-*

*राज्यातील सर्व शिक्षकांना आवाहन करण्यात येते की आपण आपल्या नौकरी विषयी कोणतीही भिती बाळगू नये.शिक्षकांच्या  व शिक्षणाच्या न्याय मागणीसाठी आपले हक्क आबादीत ठेवण्यासाठी संघटना कायम आपल्या सोबत आहे.संघटीत व्हा ,संघटनेवर विश्वास ठेवा शिक्षकांच्या अस्तित्वाच्या लढाईत सहभागी व्हा!!*

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️


 *मा.दिपक भुजबळ महाराष्ट्र राज्य*उपाध्यक्ष तथा पुणे विभाग प्रमुख*

 .

 **मा संतोष लोहार राज्य संघटक* 


 *मा.गणेश जाधव अध्यक्ष**


**मा. विजयकुमार भुजबळ*  *सरचिटणीस**


 *मा.कृष्णत हिरवळे कार्याध्यक्ष* 


 *मा.रवींद्र लटिंगे** 

*मा.सुशांत येवले* ,

*मा.उद्धव पवार जिल्हा उपाध्यक्ष** 

आणि सर्व जिल्हा कार्यकारणी तालुका कार्यकारणी सदस्य..

🙏🙏



*अखिल सातारा प्राथमिक शिक्षक संघ*


Saturday, September 20, 2025

TET परीक्षा पुनर्विचार संदर्भात निवेदन सातारा जिल्हा

 




*टीईटी सक्तीबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा यासाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ सातारा शाखा यांचेवतीने  जिल्हाधिकारी सातारा मार्फत थेट पंतप्रधान यांना निवेदन.*


सर्वोच्च न्यायालयाने नुकताच प्राथमिक शिक्षकांच्या सेवा व पदोन्नतीसाठी टीईटी सक्तीचा निर्णय दिला आहे.सदरचा निर्णयावर देशभरातील शिक्षकांमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले.मात्र निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा असल्याने याबाबतीत अनेक संघटनांमध्ये मत भिन्नता दिसून येत आहे.सदरचा निर्णय व्यवहार्य नसल्याचे शिक्षक संघटनांचे मत आहे.याबाबत देशपातळीवर कार्यरत अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला आहे.या निर्णयामुळे प्राथमिक शिक्षकांच्या मनोबलावर विपरीत परिणाम होईल.एकूणच शैक्षणिक गुणवत्ता ढासळून शिक्षणव्यवस्था धोक्यात येण्याची भीती संघटनेमार्फत व्यक्त करण्यात येत आहे.आज देशभरातील सर्व जिल्ह्यात अखिल भारतीय संघटनेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.अखिल सातारा जिल्हा  प्राथमिक शिक्षक संघाचे नेते दीपक भुजबळ,अध्यक्ष गणेश जाधव, कार्याध्यक्ष कृष्णात हिरवळे. सरचिटणीस विजय भुजबळ,राज्य संघटक संतोष लोहार.सातारा तालुका अध्यक्ष बसवराज दोडमनी यावेळी निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.

TET संदर्भात निवेदन भंडारा जिल्हा..

 *अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचा देशव्यापी राज्या-राज्यातून लढा...........*



  *दिनांक -०१सप्टेंबर २०२५ रोजी मा.सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील प्राथमिक शिक्षकांना TETपरीक्षा सक्तीची केली असल्याचा निकाल दिला आहे.सदर निकालात हस्तक्षेप करून पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी विनंती करणारे पत्र देशाचे मा. पंतप्रधान,मा . शालेय शिक्षणमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना एकाच दिवशी प्रत्येक जिल्ह्याच्या मा. जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन देण्याचे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघा कडून नियोजन करण्यात आले.त्यानुसार अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने १९/२० सप्टेंबर यापैकी आपल्या स्तरावरून सोयीनुसार निवेदन द्यायचे ठरवले..अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाचे आव्हाना नुसार अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ भंडारा च्या वतीने आज दिनांक -२०/०९/२०२५ रोजी दुपारी २:०० वाजता भंडारा जिल्ह्याचे निवासी जिल्हाधिकारी माननीय लिना फलके मॅडम यांचेमार्फत टी ई टी रद्दबाबत भारताचे प्रधानमंत्री मा . नरेंद्र मोदी, शिक्षण मंत्री मा .धर्मेंद्र प्रधान  व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले.*

 *टीईटी असो किंवा जुनी पेन्शन केंद्रापासून ते जिल्ह्यापर्यंत लढणारी एकमेव संघटना म्हणजे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ. भविष्यातील आपल्या नोकरीवर येणारे संकट लक्षात घेऊन टी ई टी बाबत देशभर लढा सुरू केलेला आहे.*

  *भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना अशी आग्रहाची विनंती आहे की, आपणही अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वात एकसंघ होऊन हा लढा जोमाने लढूया परत एकदा नम्र विनंती करण्यात येते की, आपण आपल्याकडे येणाऱ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना योग्य ते सहकार्य करून संघटनेचे सभासद होण्यासाठी व लढ्यासाठी निस्वार्थपणे मदत करावी. आज टी ई टी आणि अशाच प्रकारची अनेक संकटे  ओळखून अनेक जिल्ह्यातील सर्व कर्मचारी व शिक्षक अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे नेतृत्वावर विश्वास घेऊन अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाशी जुडतांना दिसून येत आहेत. आपणही या लढ्यात एकजुटीने सहभागी व्हावे.हिच नम्र विनंती.*

    *यावेळी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे श्री.मनोहर कहालकर जिल्हाध्यक्ष, श्री.देवानंद दुबे जिल्हा सरचिटणीस, श्री.लोकेश गायकवाड राज्य हिशोबनिस,सौ.रोहीनीताई खोकले मॅडम महिला राज्यपदाधिकारी , श्री.नरेंद्रजी रामटेके सर , श्री.गणेशजी खोकले सर,श्री.लक्ष्मणजी ईश्वरकर सर, श्री.विजयभाऊ जाधव सर, श्री.किरणभाऊ मेश्राम सर, श्री.आशिषकुमार मेश्राम सर, श्री.रामभाऊ गेडाम सर, श्री.टेकरामजी झलके सर, श्री.सुखदेवे सर उपस्थित होते.*

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Wednesday, September 17, 2025

टिईटी प्रश्नी TET शासनाचे लक्ष वेधणार.

 



*🟣टिईटी प्रश्नी  शासनाचे लक्ष वेधणार....*

*🟠अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ देशाचे पंतप्रधान व शिक्षणमंत्री यांना देणार सामुहिक निवेदन...*

**************************************

 *शिक्षकांना नोकरीत सातत्य टिकविण्यासाठी व पदोन्नती साठी यापुढे टिईटी परिक्षा पास होणे अनिवार्य असणार आहे.१ सप्टेंबर रोजी मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे दुरगामी परीणाम शिक्षण क्षेत्रावर होणार आहेत.शिक्षकांना सक्तीने सेवानिवृत्त व्हावे लागणार आहे. यासाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने भारताचे मा. पंतप्रधान व मा.शिक्षणमंत्री यांना जिल्हाधिकारी मार्फत दि.१९/२० सप्टेंबर या दिवशी निवेदन देवून या प्रश्नी तोडगा काढण्याची विनंती करण्यात येणार आहे .*

*तसेच ३ ते १०आँक्टोबर या कालावधीत देशातील सर्व लोकसभा /राज्य सभा सदस्य यांना निवेदन देवून सन २०११ पुर्वी नियुक्त कोणत्याही शिक्षकांना टिईटी सक्ती करू नये या बाबत सुधारणा करणेबाबत विनंती करणार आहेत.अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ या निर्णयास स्थगिती मिळवण्यासाठी अथवा निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्यायालयीन लढा सुद्धा लढणार आहे. याबाबत अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री.बसवराज गुर्रीकर व महासचिव कमलाकांत त्रिपाठी यांनी पत्राद्वारे कळविले आहे.*


*यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या सर्व जिल्हा शाखांना कळविण्यात येते की, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या आवाहना नुसार दि.१९/२०सप्टेंबर २०२५ रोजी या  दिवशी  आपण जिल्हाधिकारी साहेब यांचे मार्फत मा.पंतप्रधान व मा.शिक्षणमंत्री यांना निवेदन द्यावे असे राज्य अध्यक्ष देविदास बस्वदे ,सरचिटणीस कल्याण लवांडे, सल्लागार-प्रकाश दळवी, सुरेश भावसार, विश्वनाथ सुर्यवंशी ,  कार्याध्यक्ष आण्णाजी आडे, वरीष्ठ उपाध्यक्ष किरण पाटील ,कोषाध्यक्ष- विनयश्री पेडणेकर* 

*विभाग प्रमुख-प्रमोद पाटील ,दीपक भुजबळ भगवान पाटील, दिगंबर जगताप ,सुनील हाके ,केशव बुरडे उपाध्यक्ष- म.ल .देसाई ,लालासाहेब मगर ,हरिदास घोगरे, अनिल महाजन ,शिवानंद सहारकर, विजय मनवर, परमेश्वर बालकुंदे, व्ही.डी. देशमुख,एफ आय बेग* *उपसरचिटणीस-महेश देशमुख, संध्या ठाकरे,*

*संयुक्त सचिव-रविंद्र काकडे,कृष्णा चिकणे,प्रशांत पारकर,सौ. माया चाफले, राजेंद्र निमसे,रमेश सुर्यवंशी,* 

*दिलीप देवकांबळे,सौ.संगीता पागृत,सौ. शुभांगी कचरे,विलास आळे, स्वप्नील राणे, किशोर मोहिते*

*संघटक- राजा कविटकर,सौ. पद्मशाली डी. एम. बाळासाहेब कदम,शांताराम पाटील, सौ. कांचन कडू,गुरुदास कुबल,जयवंत काळे,आशाताई झिल्पे, विजय पंडित,किशोर चौधरी, संतोष लोहार,सौ. ज्योती कुर्डूणकर,सौ. सविता पिसे*

*हिशोब तपासणीस :शिवाजीराव वाळके,लोकेश गायकवाड,*

*महिला विभाग प्रमुख : उर्मिला बोंडे,*

*संयोजिकाःरंजना केणी यांनी आवाहन केले आहे.*

Tuesday, June 3, 2025

वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षण संदर्भात अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ यांचे निवेदन..

 

वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षण संदर्भात अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ यांचे निवेदन..
 

Wednesday, April 30, 2025

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ रत्नागिरी अधिवेशन

 





🌀🌀🌀🌀🌀🌀

    माननीय नामदार पालकमंत्री उदयजी सामंत साहेब  यांनी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हा अधिवेशनामध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्यासमवेत रत्नागिरी जिल्हा परिषद या ठिकाणी सर्व प्राथमिक शिक्षक संघटना यांची शिक्षकांच्या जिल्हास्तर व राज्यस्तरावरील विविध प्रलंबित प्रश्नांच्या अनुषंगाने आज बैठक घेतली .त्या बैठकीत झालेले विषय व चर्चा पुढीलप्रमाणे


*️⃣  पालकमंत्री महोदय यांनी प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या अनुषंगाने बैठक आयोजित केल्याबद्दल  व 2 मे पासून उन्हाळी सुट्टी लागू करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण केल्याबद्दल सर्व संघटना यांच्या वतीन त्यांचा सन्मान करण्यात आला.


*️⃣ आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वेतन वाढ देण्यासाठी माननीय शिक्षण संचालक महोदय यांच्याशी चर्चा करून व जिल्हा परिषद उत्पन्नातून एक विशिष्ट योजना तयार करून वेतन वाढ देता येईल का ते पहावे व हा प्रश्न सोडवावा अशा सूचना पालकमंत्री महोदय यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी  यांना दिल्या.


*️⃣ तीन वर्ष कालावधी पेक्षा जास्त कालावधी ज्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे आहे त्यांचा पदभार रोटेशनने  दुसऱ्या विस्तार अधिकारी यांच्याकडे देण्यात द्यावा अशा सूचना पालकमंत्री महोदय यांनी दिल्या.

*️⃣ केंद्रप्रमुख पदोन्नती प्रक्रिया न्यायालयात प्रविष्ट असल्याने न्यायालयीन प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून केंद्रप्रमुख पदोन्नती पूर्ण करावी अशा सूचना देण्यात आल्या.

*️⃣ नगरपालिका नगरपरिषद महानगरपालिका येथे बदलीने जाणाऱ्या शिक्षकांना ऑफलाइन एनओसी  देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू केल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांनी दिली.

*️⃣ शिक्षकांना क्यू आर कोड असलेले डिजिटल आयकार्ड उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया लवकर राबवावी अशा सूचना पालकमंत्री महोदय यांनी दिल्या.

*️⃣ सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांना सेवानिवृत्त दिनांकाच्या दिवशी त्याची सर्व प्रकारचे देयके मिळण्यास विलंब का होतो , त्यांना आनंददायी पेन्शन योजनेचा लाभ का लगेच मिळत नाही याची विचारणा पालकमंत्री महोदय यांनी अधिकाऱ्यांना  केली. भविष्यात याबाबत कोणतीही दिरंगाई होणार नाही याची काळजी घेण्यात यावी अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

*प्रॉव्हिडंट फंड रकमा मागणी केल्यास लवकरात लवकर त्या शिक्षकांना मिळत नाहीत त्याबाबत पालकमंत्री महोदयांनी  त्या लवकरात लवकर कशा मिळतील याची काळजी घेण्याच्या  सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

*️⃣ वैद्यकीय बिले तात्काळ मंजूर करण्यात यावेत.त्यात कोणीही दिरंगाई करू नये.

*️⃣ शालेय पोषण आहार धान्य पुरवठा वेळेत होत नसल्याबाबत पालकमंत्री महोदय यांनी नाराजी व्यक्त केली व संबंधित ठेकेदाराला जिल्हा परिषद या ठिकाणी बोलावून  घेऊन धान्य पुरवठा वेळेत कसा होईल याची काळजी घेण्यात यावी असे सांगितले.

*️⃣ संघटनांचे जिल्हाध्यक्ष किंवा सचिव यांना महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी जिल्हा परिषद मध्ये येण्यासाठी परवानगी देण्यात यावी व तसे अधिकृत पत्र काढावे असे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले.

*️⃣ दिव्यांग शिक्षक यांना शासननिर्णया प्रमाणे विविध  सोई सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

*️⃣ पालकमंत्री महोदय यांनी  विद्यार्थी सुरक्षा,विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

*️⃣ राज्यस्तरावरील संच मान्यता शासन निर्णय रद्द करणे ,मुख्यालय अट रद्द करणे, शिक्षण सेवक कालावधी रद्द करून नवीन शिक्षण सेवकांना नियमित शिक्षक करणे, शिक्षकांना मेडिक्लेम सुविधा उपलब्ध करून देणे व जुनी पेन्शन योजना लागू करणे या विषयासाठी राज्यस्तरावर संबंधित खात्याचे मंत्री यांच्यासोबत  संघटनांची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन पालकमंत्री महोदय यांनी दिले.

 

पालकमंत्री महोदय यांनी ही सभा आयोजित केल्याबद्दल  त्यांचे व सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानून सभेची सांगता करण्यात आली.


अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ रत्नागिरी 


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Monday, April 28, 2025

अखिल सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाची नूतन कार्यकारिणी

 *






अखिल सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाची सोलापूरात बैठक संपन्न.*

🌹🌹🌹🌹🌹🌹

*नुतन जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली.*

*सोलापूर येथील जिल्हा शिक्षक पतसंस्थेच्या कार्यालयात अखिल सोलापूर जिल्हा कार्यकारीणी निवडीसाठी नेते बाळासाहेब ढगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा प्रदेशाध्यक्ष देविदासराव बस्वदे, उपाध्यक्ष तथा पुणे विभाग प्रमुख दिपक भुजबळ,माध्यम प्रमुख चंद्रकांत मेकाले, नांदेड जिल्हा सल्लागार तुका पाटील जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. आज संपन्न  झालेल्या  बैठकीत अखिल सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाची नुतन कार्यकारीणी खालील प्रमाणे निवडण्यात आली.*

*जिल्हा नेते: बाळासाहेब ढगे*

*दिनानाथ बाबर(सोलापूर) जिल्हाध्यक्ष,*

 *रामकृष्ण काटकर (अकलूज)  सरचिटणीस,*

*मनोज गादेकर (माढा) कार्याध्यक्ष,* 

*आनंद होनराव (बार्शि) कोषाध्यक्ष,* 

*अंबादास बनसोडे (उत्तरसोलापूर) वरिष्ठ उपाध्यक्ष*  

 *यावेळी जहांगिर शेख, किशोर कुलकर्णी,अरविंद शिंदे,अल्ताफ अत्तार, सचिदानंद बरबडे,अभिमन्यू गायकवाड,अनिल गुंड, बाळासाहेब खूने यांची उपस्थिती होती.*

अखिल महा. प्राथ. शिक्षक संघ भंडारा.. नूतन कार्यकारिणी

 







*अखिल महा. प्राथ. शिक्षक संघ भंडारा*

`जिल्हा सभा`


*आज दिनांक 27 एप्रिल 2025 रोज रविवारला जे. के. हायस्कूल भंडारा येथे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ भंडाराची सभा मा.अन्नाजी आडे सर कार्याध्यक्ष राज्य संघटना यांच्या अध्यक्षतेखाली मा. गोरे सर, मा. पवार सर, मा.केशव बुरडे सर मा.लोकेश गायकवाड सर राज्य पदाधिकारी तसेच मा.रमेश सिंगनजुडे सर जिल्हा सल्लागार, मा. बाळकृष्ण भुते सर जिल्हाअध्यक्ष मा. राजेश सुर्यवंशी सर. मा.विकास गायधने सर, मा. रशेष फटे सर, मा. सुरेश कोरे सर. मा. नरेश शिवरकर सर, मा. आदेश बोंबार्डे सर संचालक ग्राहक, शिक्षक पतसंस्था, सर्व जिल्हा पदाधिकारी, सर्व तालुका अध्यक्ष, सरचिटणीस व सर्व पदाधिकारी, सभासद बंधू आणि भगिनी यांचे उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणी विस्तार व रीक्तपदे भरण्यासंदर्भात सभा पार पडली.*

*सभेमध्ये खालीलप्रमाणे जिल्हा कार्यकारीणी गठीत करण्यात आली.*

*श्री.मनोहर कहालकर - अध्यक्ष*

 *श्री.देवानंद दुबे - सरचिटणीस*

*श्री. बाळकृष्ण भुते - शिक्षक नेते* 

*श्री.ओंकार कठाने -  कार्याध्यक्ष*

 *श्री.विजय जाधव - कोषाध्यक्ष*

*श्री.महेश जगनीक - प्रवक्ता*

 *श्री.रामभाऊ गेडाम - संयुक्त सरचिटणीस*

*श्री.सिताराम मारबते  व श्री.प्रदीप दिघोरे - प्रसिद्धी प्रमुख*

*श्री. भांडारकर सर - जिल्हा उपाध्यक्ष*

*महिला जिल्हा अध्यक्ष - कु.ज्योती नागलवाडे*

 *माला नगरे मॅडम - सरचिटणीस*

 *रोहिणी खोकले - राज्य महिला प्रतिनिधी*

*यांची एकमताने निवड झाली.*


*सर्वांचे अभिनंदन व पुढील वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा💐🌷🌹.*

अखिल नागपूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ कार्यकारणीची निवड

 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

*🤛संघटन म्हणजे पोलादी मनगट🤜*







🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*जिल्हा कार्यकारिणी निवड सभा*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*अखिल नागपूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

      आज दिनांक 27/04/2025 रोज रविवार ला विदर्भ बुनयादी हायस्कूल सक्करदरा नागपूर येथे *अखिल नागपूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाची* सभा संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष *आदरणीय श्री अशोक बावनकुळे सर* यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. 

       या सभेला *अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटनेचे जनरल कॉन्सिल सदस्य श्री रामूभाऊ गोतमारे सर*  राज्य संघटनेचे उपाध्यक्ष *श्री शिवानंद सहारकर सर* राज्य संघटक *सौ. आशाताई झीलपे मॅडम* सन्माननीय श्री वंजारी सर, श्री सुनील पेटकर सर, श्री मनोहर बेले सर, श्री प्रकाश बांबल सर, श्री चामट सर, सौ टिपरे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.


      सभेमध्ये पुढील तीन वर्षासाठी खालील प्रमाणे नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.


*🤝जिल्हा अध्यक्ष🤝*

*श्री धनराज बोडे सर*


*🤝जिल्हा सरचिटणीस 🤝*

*श्री वीरेंद्र वाघमारे सर*


*🤝कार्याध्यक्ष 🤝*

*श्री आनंद गिरडकर सर*


        वरील प्रमाणे प्रमुख तीन पदांची निवड करण्यात आली.

कार्यकारिणीचा उर्वरित विस्तार करण्याचे अधिकार  नवनियुक्त अध्यक्ष, सरचिटणीस व कार्याध्यक्ष यांना सभेच्या वतीने सर्वानुमते देण्यात आले.


या सभेला जिल्ह्यातील तेरा ही तालुक्यातील तालुका अध्यक्ष व सचिव तथा जिल्हा व तालुक्यातील सर्व मान्यवर पदाधिकारी व संघटनेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पडली. 


नवनियुक्त अध्यक्ष, सरचिटणीस व कार्याध्यक्ष यांचे राष्ट्रीय कॉन्सिल चे पदाधिकारी, राज्य पदाधिकारी व जिल्यातील सर्व उपस्थितांनी स्वागत केले. 

       सभेला श्री डी व्ही वंजारी सर व श्री अशोक बावनकुळे सर यांनी मार्गदर्शन केले.

सभेचे संचलन श्री वीरेंद्र वाघमारे व श्री हांडे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री दिलीप जीभकाटे सर यांनी केले.

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

*वृत्तांकन:- श्री लोकेश सुर्यवंशी*

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

कर्तुत्वाने व नेत्रदानाने अजरामर झालेल्या तेजस्वी स्व. सुनिताताई पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली..

 *कर्तुत्वाने व नेत्रदानाने अजरामर झालेल्या तेजस्वी स्व. सुनिताताई पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली* 


अखिल अमरावती महिला जिल्हा संघाच्या आधारस्तंभ कित्येक महिला शिक्षिकांच्या प्रेरणास्त्रोत,अखिल परिवारातील एक हसतमुख कार्यमग्न व्यक्तिमत्व सुनीता किरण पाटील. अकस्मात अपघाताचे निमित्त घडून अखिल परिवाराला कायमचा सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेल्या. जीवनाच्या वाटेवरून निघून जातानाही आपले नेत्रदान करून कुण्यातरी व्यक्तीला जग दाखविण्याचं सामर्थ्य देऊन गेल्या. जग सोडून जाताना आपले अवयव इतरांना देऊन, त्यांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा, ही त्यांची विचारसरणी.अवयवदान करण्याची पायाभरणी त्यांनी आधीच केलेली होती.पती श्री किरणजी पाटील,मुलगी तनुजा पाटील व इतर कुटुंबातील सदस्यांसोबत अवयवदानाबद्दल त्यांनी यापूर्वीच चर्चा करून निर्णय घेतलेला होता.या निर्णयाची अंमलबजावणी अतिशय कठीण प्रसंगात असामान्य धैर्य दाखवून पाटील कुटुंबीयांनी पूर्णत्वास नेऊन स्व. सुनीताताईंना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण केली.

      अमरावती जिल्हा संघाच्या संघटनेच्या जडणघडणीत ज्या शिक्षकांचा वाटा आहे, त्यामध्ये महिला शिक्षकांमधून सुनिता ताईंचा सिंहाचा वाटा आहे. संपूर्ण जिल्ह्याभर अखिल परिवाराचे जाळे अमूल्य योगदान आहे.संघटनेचा कोणताही कार्यक्रम असो, त्या कार्यक्रमाच्या नियोजनात स्व. सुनीताताईंचा सहभाग नाही,असं कधी घडलं नाही. स्टेजची तयारी असो,स्वागताचा कार्यक्रम असो,कार्यक्रमात त्यांनी आपली यशस्वी भूमिका व कर्तव्य यशस्वीरित्या पार पाडले.संघ परिवार त्यांचेही अभूतपूर्व कार्य कधीही विसरू शकणार नाही. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या प्रत्येक अधिवेशनात त्यांची उपस्थिती ही प्रकर्षाने राहायची. अनेक महिला व त्यांच्या कुटुंबांना घेऊन संपूर्ण भारतभर कित्येक यशस्वी प्रवासाचे नियोजन त्यांनी पार पाडले. सहकाऱ्यांना कठीण प्रसंगी मदत करून त्यांची समस्या सोडविण्यात ताईंचा वाटा आहे.

     प्राथमिक शिक्षिका म्हणून स्व.सुनीताताईंचा प्रवास सुरू झाला. एक आदर्श उपक्रमशील शिक्षिका व शिक्षकांच्या न्यायहक्कासाठी लढणारी एक रणरागिणी हे दोन्ही रूपे पाहावयास मिळाली. चिखलदरा सारख्या दुर्गम भागातून त्यांनी सेवेची सुरुवात केली, त्यानंतर पदवीधर शिक्षिका म्हणून त्यांनी कार्य केले. क्रीडा महोत्सवामध्ये प्रत्येक वर्षी त्यांनी टेनीक्वाईटच्या अंतिम किंवा उपविजेते हमखास ठरलेलं पारितोषिक त्यांच्या नावावर असायचं.यामध्ये सातत्य होते.कधीच खंड पडला नाही. खेळण्याची त्यांना प्रचंड आवड होती आणि हीच खेळाडूवृत्ती त्यांनी जीवनामध्ये उपयोगात आणली.संपूर्ण कुटुंबात प्रसन्न वातावरण तयार करून श्री. किरणजी पाटील यांना समर्थपणे साथ दिली.ताईंच्या अनेक आठवणी अखिल परिवारातील अनेकांना सोबत जोडलेल्या आहेत. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या नेत्या स्व. सुलभाताई दोंदे यांचा अमरावतीमधील मुक्काम सुनीता ताईंच्याच घरी असायचा. ताईमुळे मी आज शिक्षक आहे, हे आवर्जून श्री अमोलजी आखाडे सर सांगतात; नाहीतर मी एक मवाली म्हणूनच राहिलो असतो, हे ते स्वतः सांगतात. स्व . चंदनजी खर्चान सर यांच्या आजारांवर उपचारांसाठी श्री किरणजी पाटील सरांनी घेतलेल्या निणर्याच सुनिता ताईनी समर्थन करून खंबीर पाठिंबा दिला .ताईंचे अकस्मात निघून जाणे अखिल अमरावती जिल्हा संघासाठी फार मोठी हानी आहे. ही पोकळी भरून येणे अशक्य आहे. नियती पुढे मनुष्याचे काही एक चालत नाही. मिळालेलं आयुष्य तुम्ही कशाप्रकारे जगलंत, यावरच तुमचं मूल्यमापन होतं. ताईंच्या या आयुष्याचं मूल्यमापन करताना हेच करावं लागेल,संघटनेसाठी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ताई एक समर्पित व्यक्तिमत्व होत्या.

सासू आणि आईमध्ये फरक न करणारे व्यक्तिमत्व म्हणजे सुनीता ताई पाटील. सासूचा धुमधडाक्यात अमृत महोत्सव साजरा करणारी, सुनेचं पूर्ण कर्तव्य पार पाडणारी सुनीता ताई एक अनोखं व्यक्तिमत्त्व होतं.

सुनीता ताईंचं अचानक निघून जाणं हे अनाकलनीय आहे. ताईंच्या बाबतीत 'जो आवडतो सर्वांना तोच आवडे देवाला' हेच वाक्य लागू पडते. अखिल अमरावती जिल्हा संघ परिवाराकडून ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली.



✒️ सुभाष सहारे, जिल्हा सरचिटणीस अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा अमरावती

🟰🟰🟰🟰🟰🟰

विविध शालेय समित्यांचे एकत्रिकरण ..अखिलच्या पाठपुराव्यास यश..

 🌴🌴🌴🌴🌴

*Education International*

🛑 *अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाशी सलग्न* 

🟥 *अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*


🟪 *राज्यातील शाळांमधील अस्तित्वात असलेल्या विविध शालेय समित्यांचे अखेर एकत्रीकरण*


 🟢 *शालेय शिक्षण मंत्री ना दादा भुसे साहेब यांचा ऐतिहासिक निर्णय*


 🟦 *अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचा सुमारे सात वर्षापासूनचा या प्रलंबित प्रश्नाच्या पाठपुराव्यास यश*


🟣 *राज्यातील शाळांमध्ये अस्तित्वात असलेल्या विविध शालेय समित्यांचे एकत्रिकरण करून शालेय स्तरावर शाळा व्यवस्थापन समितीमध्ये अन्य समिती यांचा समावेश करून विविध शालेय समित्यांचे समावेशन करण्याची मागणी तत्कालीन शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांच्याकडेस दिनांक ४ ऑक्टोबर २०१८ रोजी संघटनेने निवेदन देऊन केली होती . शासनाने याची दखल घेऊन विविध शालेय समित्यांचे एकत्रीकरण करून शालेय स्तरावर फक्त चारच समित्या गठित करण्यात आल्या आहेत*


🟤 *तत्पूर्वी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्यकार्याध्यक्ष अण्णा आडे ( जि चंद्रपूर ) व राज्यसंघटक राजेंद्र निमसे ( जि . अहिल्यानगर यांच्या दि ४ ऑक्टोबर २०१८ च्या निवेदनानुसार शिक्षण संचालक (प्राथ) यांचा शालेय समिती एकत्रीकरण करण्याचा प्रस्ताव हा शालेय शिक्षण विभाग , मुंबई यांना ४ एप्रिल २०१९ रोजी सादर झाला होता . मात्र पूढे कोविड २०१९ च्या महामारीमूळे हा प्रस्ताव रखडला होता . अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने तत्कालीन महसूलमंत्री मा राधाकृष्ण विखे पाटील यांना याबाबत निवेदन देऊन याबाबत शिफारस करण्याची विनंती केली होती . मा ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी तत्कालीन शिक्षणमंत्री ना दीपक केसरकर यांच्याकडे १०ऑक्टोबर २०२२ रोजी तशी शिफारस केली होती . मात्र मंत्रालयीन पातळीवरील प्रशासकीय अधिकारी यांच्या दुर्लक्षेतेमुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला होता .तरीही अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचा मंत्रालय पातळीवरील पाठपुरावा अथकपणे चालूच होता*


🟩 *दरम्यान राज्याचे कर्तबगार शालेय शिक्षणमंत्री ना दादा भुसे यांनी राज्यातील सर्व शिक्षक समन्वय संघटनांची जयहिंद कॉलेज ,मुंबई येथे ५ जानेवारी २०२५ रोजी बैठक घेऊन यामध्ये विविध प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते . या आश्वासनामध्ये प्रामुख्याने शालेय स्तरावर अस्तित्वात असलेल्या विविध १५ समित्यांच्या क्लिष्ट कामामुळे मुख्याध्यापक व शिक्षक मेटाकुटीस आल्याची तक्रार अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटना यांचे बरोबरच अन्य संघटनांनी मांडली होती . त्याच अनुषंगाने शिक्षण संचालक (प्राथ)शरद गोसावी व शिक्षण संचालक ( माध्य) संपत सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षण सहसंचालक रमाकांत काठमोरे यांनी राज्यातील विविध प्रशासकीय अधिकारी , मुख्याध्यापक व तज्ञ शिक्षक यांच्या राज्यस्तरीय १६ कमिटी सदस्यीय समिती स्थापन केली .या समितीने राज्यभरातील प्राथमिक ,माध्यमिक व खाजगी शाळांमधील शालेय स्तरांवर अस्तित्वात असलेल्या समित्यांचे सर्व शासकीय दस्तावेज व त्यांची  सर्व परिपत्रके , शासन निर्णय यांचा संयुक्तपणे अभ्यास करून कधी ऑनलाईन तर कधी ऑफलाइन मॅरेथॉन बैठका घेऊन एक प्रारुप तयार करण्यात आले . सदर प्रारूप शिक्षण संचालक प्राथमिक यांचे पातळीवरून शालेय शिक्षण विभाग , मुंबई यांना सादर करण्यास आले होते .*


 🟪 *शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव विजय भोसले यांनी याच अनुषंगाने शालेय स्तरावर चार समित्या व त्यांची नेमणूक , कार्यप्रणाली याबाबतचा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आहे .*


 🟣 *या शासन निर्णयामुळे शालेय स्तरावरील विविध प्रकारच्या समित्यांची संख्या कमी होऊन  आवश्यक तेवढ्याच कायद्यानुसार तयार झालेल्या फक्त चारच समित्या ठेवण्यात आल्या आहेत . त्यामुळे या १५ समित्याच्या बैठका घेणे , अजेंडा पाठविणे , इतिवृत्त ठेवणे या किचकट कामातून मुख्याध्यापक व शिक्षकांची बव्हंशी या अतिरिक्त कामातून मुक्तता मिळाल्यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे*


🔴 *या ऐतिहासिक शासन निर्णयाचे स्वागत अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्याध्यक्ष देविदास बस्वदे ,राज्यसरचिटणीस कल्याण लवांडे ,राज्य कार्याध्यक्ष अण्णा आडे ,राज्य कोषाध्यक्ष विनयश्री पेडणेकर ,राज्य सल्लागार प्रकाश दळवी ,सुरेश भावसार, विश्वनाथ सूर्यवंशी, राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष किरण पाटील ,राज्य संयुक्तसचिव राजेंद्र निमसे ,राज्य संघटक बाळासाहेब कदम ,राज्य महिला आघाडी अध्यक्षा उर्मिला बोंडे ,अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष शरद वांढेकर,ऐक्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष  प्रदीप चक्रनारायण ,सुनील शिंदे विलास लवांडे ,सुधीर बोऱ्हाडे ,सुरेश नवले ,सुधीर रणदिवे ,दत्तात्रय परहर , रज्जाक सय्यद ,संदीप भालेराव, मधुकर डहाळे ,रामप्रसाद आव्हाड ,विष्णू बांगर,भाऊसाहेब घोरपडे ,ज्ञानदेव कराड,महेश लोखंडे,बाळासाहेब जाधव,सुनील दरंदले ,बजरंग बांदल,संदीप शेळके , बापूराव वावगे,राजकुमार शहाणे , शिवाजी ढाकणे,प्रकाश पटेकर ,पांडुरंग देवकर,नंदू गायकवाड,लक्ष्मण चेमटे,संतोष ठाणगे ,संजय शेळके,संदीप काळे , भारत शिरसाठ ,शहाजी जरे ,रवींद्र अनाप ,जनार्दन काळे,सुखदेव डेंगळे ,संभाजी तुपेरे,शिवाजी माने , पांडुरंग झरेकर ,प्रवीण शेळके , विनायक गोरे ,अनिता उदबत्ते , संगीता घोडके ,संगीता निमसे ,संगीता निगळे ,उज्वला घोरपडे ,मनीषा क्षेत्रे , सुरेखा बळीद यांनी केले आहे .*


🛑 *तालुकास्तर ते  देशपातळीवरील प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवणारी व त्या समवेत संपूर्ण शासकीय दस्तावेज व शासन निर्णय व तत्संबंधी परिपत्रकाद्वारे प्रलंबित प्रश्न सोडविणारी राज्यातील एकमेव प्राथमिक शिक्षक संघटना*


 🔸 *आपला स्नेहांकित*🔸


      *(राजेंद्र निमसे)*

     *राज्य संयुक्तसचिव* 

*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ*

तथा 


           *(संचालक )*

 *प्राथमिक शिक्षक:विकास मंडळ*

 *जिल्हा -अहिल्यानगर*

( ऐक्य मंडळ - अहिल्यानगर )

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

अखिल सांगली प्राथमिक शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष निवड

 






*आज सांगली येथे मार्गदर्शक सदाशिवराव मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा.देविदास बस्वदे,उपाध्यक्ष दिपक भुजबळ, माध्यम प्रमुख चंद्रकांत मेकाले, तुका पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. मोहीते पाटील सरांनी टिम अखिलचे मनस्वी स्वागत केले.*

*तदनंतर अखिल सांगली जिल्हा कार्यकारीणीची मोहीते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली   अखिल सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी मुकूंद पंडीत तसेच सरचिटणीस पदी संतोष आंबे यांची निवड करण्यात आली.*यावेळी सदाशिव मोहीते,जिल्हानेते भानूदास चव्हाण, प्रकाश सुतार,प्रकाश कुचकर, सिद्राम मलमे यांची उपस्थिती होती*

Saturday, April 26, 2025

देविदास बसवदे यांची सदिच्छा भेट

 






*अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष* तथा *अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष देविदास बसवदे* यांचा आज *सातारच्या राजधानीत*   *शाल श्रीफळ व सातारच्या सहवासात* हे पुस्तक देऊन अखिल सातारा प्राथमिक शिक्षक संघाचे सल्लागार मार्गदर्शक *शंकरराव भुजबळ* आप्पा यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला, त्याचबरोबर *राज्य संघटक चंद्रकांत मेकाले सर* यांचा राज्य उपाध्यक्ष तथा पश्चिम विभाग प्रमुख *दीपक जी भुजबळ* यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

 *अखिलचे संघटक तुकाराम पाटील* सर यांचा सत्कार अखिल सातारा प्राथमिक संघाचे सरचिटणीस *विजयजी भुजबळ* यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला.

याप्रसंगी अखिल सातारा *प्राथमिक संघाचे मार्गदर्शक हनमंत नलवडे सर , किरणजी भुजबळ* आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी राष्ट्रीय कार्याध्यक्ष देविदासजी बसवदे यांच्या हस्ते इयत्ता 5 वी मधील *शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाबद्दल विजय* *भुजबळ* यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला..

केंद्रीय शिक्षा मंत्री मा.श्री.धर्मेंद्र प्रधान यांची अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट..

  *🟣केंद्रीय शिक्षा मंत्री मा.श्री.धर्मेंद्र प्रधान यांची अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट* ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ *...