Monday, October 6, 2025

आचार्य मोरेश्वर वासुदेव दोंदे..

 *आचार्य मोरेश्वर वासुदेव दोंदे* 





२० व्या शतकातील प्रबोधनाच्या चळवळीत महाराष्ट्रातील अनेक शिलेदार अधोरेखित आहेत. आचार्य मो. वा. दोंदे हे त्यापैकीच एक. त्यांचे संपूर्ण नांव मोरेश्वर वासुदेव दोंदे. *दादासाहेब* या आदरयुक्त उपाधीने ते परिचित राहिलेले आहेत.  ते मुळचे ठाणे जिल्ह्यातील.४ आँगस्ट १८९४ ही त्यांची जन्म तारीख. विल्सन काँलेजमधून १९१५ साली, त्यांनी बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण केली.  नामदार गोपाळ क्रुष्ण गोखले यांंची विचारश्रुष्टी व प्राचार्य टी. ए. कुलकर्णी यांच्या अथक कर्तृत्वातून, गोखले एज्युकेशन सोसायटीची स्थापन झालेली होती. त्या संस्थेच्या मुंबईतील परळच्या आर.एम.भट हायस्कूलमध्ये आचार्य दोंदे यांनी शिक्षकीपेशा स्वीकारला. १९२८ ते १९५४ या काळात त्यांनी उपरोक्त शाळेत प्राचार्यपद  सांभाळलं.

 मोरेश्वर यांचे ना.म.जोशी यांच्या समाज सेवा संघाच्या कार्यालयात नेहमी जाणेयेणे असे. बाबासाहेबही जोशींच्या कार्यालयात कधीकधी जात असत. त्याच कार्यालयात मोरेश्वर यांची बाबासाहेबांशी भेट झाली. गांधीजींच्या दलितोध्दाराच्या संकल्पनांपेक्षा बाबासाहेबांची ध्येयधोरणं आणि विचार प्रभावी व ठोस असल्याचे मोरेश्वर यांना जाणवले.मोरेश्वर बाबासाहेबांच्या विचारांनी प्रभावित झाले. दलितोध्दारासाठी गांधीजींचा हरिजनोध्दाराचा मार्ग कुचकामी व बेगडी असल्याचे मोरेश्वर यांची पक्की खात्री झाली. ते गांधीजींपासून, त्यांच्या विचारांपासून आणि पर्यायाने काँग्रेसपासून राजकीयदृष्ट्या बाजूला होऊ लागले. त्यांच्या मनावर बाबासाहेबांच्या विचारांचा पगडा बसू लागला. ते काँग्रेस पक्षापासून १९२८ साली कायमचे व पूर्णतः अलिप्त झाले. आता ते जनमानसात ' *दादासाहेब* ' म्हणून जास्त ओळखले जाऊ लागले होते.

 कधी समाज सेवा संघाच्या कार्यालयात, तर कधी बाबासाहेबांच्या कार्यालयात बापूसाहेब सहस्त्रबुद्धे, देवराव नाईक, अनंतराव चित्रे, भास्करराव कद्रेकर, कमलाकांत चित्रे, दत्तात्रय प्रधान, रामचंद्र कवळी आणि दादासाहेब दोंदे यांच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैचारिक गप्पा होऊ लागल्या.

 एव्हाना बाबासाहेब आणि दादासाहेब यांचे संबंध खूपच दृढ झाले होते. त्या दोघांमध्ये कौटुंबिक जिव्हाळा निर्माण झाला होता.

      

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक  संघ ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी शिक्षक संघटना १९१० साली स्थापना झाली .त्याकाळी स्वातंत्र्य चळवळ उभारणे हा एकमेव हेतू होता .मुंबई इलाखा प्राथमिक शिक्षक संघ नावाने संघटनेची स्थापना झाली होती.

सन १९४५ ला मुंबई राज्य प्राथमिक शिक्षक संघ अशी पुनर्रचना करण्यात आली,व पहिंले अधिवेशन पुणे येथे घेण्यात आले ,अध्यक्ष स्थानी संस्थेचे संस्थापक आचार्य दादासाहेब उर्फ मो.वा.दोंदे हे होते.पहिली मागणी शिक्षकांचा पगार १५ रु.वरुन ३० रु.करणे त्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्यासाठी, त्यांनी शिक्षकांचा अभूतपूर्व संप घडवून आणला होता.कर्मवीर भाऊराव पाटील, आचार्य अत्रे यांची साथ संपाला लाभली.  संपाच्या परिणामातून शिक्षकांच्या मुलभूत मागण्यांंची दखल, स्वातंत्र्यपूर्व इंग्रज राजवटीतील सरकारला घ्यावी लागलेली होती. त्यांनी अव्याहतपणे शैक्षणिक कार्यात स्वताला झोकून दिलेलं होतं. सेवानिव्रूतीच्या निमित्ताने त्यांना प्राप्त झालेलं उत्पन्नही, त्यांनी विविध शाळांना दान म्हणून दिलेलं होतं. 

७ जानेवारी १९५४ला अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना नागपूर येथे तत्कालीन प्रधानमंत्री पं.जवाहरलाल नेहरु यांच्या उपस्थितीत झाली.तेव्हापासून दर दोन वर्षाला संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन होते.सन १९६०ला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ या नावाने महाराष्टात संघटनेच नामकरण झालं.


  बाबासाहेबांनी १५ आॅगस्ट १९३६ रोजी ' *स्वतंत्र मजूर पक्षाची* ' स्थापना करीत असल्याची घोषणा केली. त्यांची या पक्षाचे अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली, तर पक्षाचे *उपाध्यक्ष* म्हणून मोरेश्वर वासुदेव अर्थात *दादासाहेब दोंदे* यांची निवड करण्यात आली. त्यावरूनच बाबासाहेबांचे आणि दादासाहेबांचे संबंध किती घनिष्ठ होते याचा प्रत्यय येतो. स्वतंत्र मजूर पक्षाला १९३७ सालच्या मुंबई इलाख्याच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाले.


 बाबासाहेबांनी लिहिलेल्या 'थाॅट्स आॅन पाकिस्तान' या ग्रंथावर मुंबईतील हेमंत व्याख्यानमालेत वागळे हाॅलमध्ये १८ ते २० फेब्रुवारी १९४२ या तीन दिवशी परिसंवाद झाला. या तीनही दिवसातील परिसंवादाचे अध्यक्ष दादासाहेब दोंदे होते.

बाबासाहेब कायदेमंत्री असताना मुंबईतील एका भेटीदरम्यान त्यांनी दादासाहेबांना राष्ट्रीय कामगार आयुक्त म्हणून नियुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

 

बाबासाहेबांनी ८ जुलै १९४५ रोजी मुंबईमध्ये ' *पीपल्स एज्युकेशन सोसायटी (पीईएस)* या शिक्षणसंस्थेची स्थापना केली. संस्थेच्या पहिल्या कार्यकारी मंडळावर निस्पृह आणि विश्वासू असलेले दादासाहेब दोंदे यांची सचिव म्हणून निवड केली. बाबासाहेब जेव्हा मुंबईत येत तेव्हा पीईएसच्या कार्यकारिणीची बैठक होई. या बैठकीला दादासाहेब न चुकता हजेरी लावत.


मास्तरकीच्या नोकरीवर त्यांचे सर्वात जास्त प्रेम होते. मास्तर या शब्दाची व्याख्या ते ' *मायेचे अस्तर पांघरणारा तो मास्तर* ' अशी करीत असत.


बासाहेबांनी आपला मुलगा यशवंत तथा भैय्यासाहेब यांस, दोंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली आर. एम. भट हायस्कूलमध्ये दाखल केलेलं होतं. आचार्य दोंदे सर, हे प्रभावी वक्ते होते. त्यांचे विवेचन चिंतनगर्भ असे. १९४२ साली डॉ. आंबेडकरांचा जन्मदिवस त्यांच्या अनुयायांनी मुंबईमध्ये आयोजित केलेला होता.  त्या समारंभाचे अध्यक्षस्थान दोंदे सरांनी भुषविले होते.  " *डॉ. आंबेडकरांचे संर्घशमय कार्य हे भारतातील सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनासाठी महत्वपुर्ण ठरते आहे* ." असे प्रतिपादन त्यांनी त्यावेळी केले होते. १९४८ साली त्यांनी डॉ. आंबेडकर व त्यांच्या सुविद्य सहचारिणी, सविता तथा माईसाहेब आंबेडकर यांचा सत्कार समारंभ आर. एम. भट. हायस्कूलमध्ये घडवून आणला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुुंबईतील 'राजग्रुह' हे निवासस्थान त्यांच्या हजारो दुर्मिळ ग्रथांचे माहेरघर होतं. त्या ग्रंथालयातील पंचवीस हजार ग्रंथांची क्रमवार सूची तयार करण्यात, दोंदे सरांचा मोलाचा सहभाग राहिलेला होता.

 १४ आँक्टोंबर १९५६ रोजी, बाबासाहेबांनी बुद्धधम्माची नागपुरात दिक्षा स्वीकारली. त्या धर्मांतराचे समर्थन व स्वागत करणारे पत्र, दोंंदे सरांंनी बाबासाहेेबांंना पाठविलेे होतेे.


 ६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांचे निर्वाण झाले. ७ डिसेंबर रोजी मुंबईच्या दादर येथील चैत्यभूमीवर आंदरांजली सभा आयोजित केलेली होती. त्यावेळी कर्मवीर दादासाहेब गायकवाड,  प्र. के. अत्रे आणि आचार्य दोंदे यांसह काही मोजक्याच धुरीणांची शोक प्रकट करणारी भाषणं, सदर सभेत झाली होती. त्यावेळी आचार्यांनी अत्यंत भावोत्कट असं मनोगत व्यक्त केलेलं होतं.


प्रिन्सिपाल मो. वा. दोंदे यांचे मुंबईत नभोवाणीवर बाबासाहेबांच्या वर भाषण झाले.  ते 'नवशक्ति च्या ८ डिसेंबर १९५६ च्या अंकात दुसऱ्या पानावर प्रसिद्ध झाले.

प्राचार्य दोंदे यांनी गुरुवारी मुंबई आकाशवाणी केंद्रावर बाबासाहेबांना आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहाणारे भाषण केले होते‌.त्यात त्यांनी त्यांच्या धर्मांतराच्या तत्त्वज्ञानाची साधकबाधक विचारांची चर्चा केली होती.   


१९५७ च्या  विधानसभा निवडणुकीनंतर मुंबई आणि पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांत संयुक्त महाराष्ट्र समितीला दणदणीत यश मिळाले. त्यावेळी मुंबई महानगरपालिकेत १३१ जागा होत्या. त्यापैकी ७२ जागा समितीला आणि ५७ जागा काँग्रेसला मिळाल्या.

महापौरपदाच्या निवडणुकीत समितीचे उमेदवार आचार्य दोंदे ७७ मते मिळवून विजयी झाले.  


अशा या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तनाच्या चळवळीच्या क्रुतीशील समर्थकाचे ७ ऑक्टोबर सन १९६४ला मुंबईत निधन झाले.


संदर्भ : चांगदेव भवानराव खैरमोडे,भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड १२

डाॅ.बाबासाहेब.आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी.- योगीराज बागुल

Thursday, October 2, 2025

TET आणि अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ

 *संघ शक्ती, युगे युगे*

*टी ई टी व अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ.....*

    *--------------------------------------*



 *4 -ऑक्टोबर 2025 चा महाराष्ट्र मध्यवर्ती शिक्षक संघटनेचा मूक मोर्चा स्थगित करण्यात यश मिळाले. टी ई टी बाबत सुप्रिम कोर्टाच्या निर्णयामुळे आज संपूर्ण देशात रण माजले असतांना व टी ई टी हा सर्व शिक्षकांच्या गळ्यातील फास झाल्यानंतर त्यातून मार्ग काढण्यासाठी सर्व शिक्षक तारणहार म्हणून सर्व संघटनाकडे शिक्षक मोठ्या अपेक्षेनी बघत आहेत. आणि झाले ही तसेच, बऱ्याचश्या संघटना ह्या आपल्या राज्याच्या पुनर्विचार याचिकेची वाट बघतांना दिसतात.*

    *मुकमोर्चा काढायचा म्हटला पण तो स्थागित झाल्यावर त्यावरती पण राज्य संघटना होकार दर्शविल्यानंतर आता शिक्षकांकडून प्रश्न विचारल्या जात आहे.* 

*जर राज्य सरकार कडून* *30 दिवसानंतर न्यायालयात याचिका घातल्यास ती स्वीकार होणार काय?*

*महाराष्ट्र राज्याच्या विरुद्धच निर्णय* *असल्यामुळे पुढे काय*

   अश्या अनेक प्रश्नांमुळे शिक्षक पुर्णतः नैराश्येत आहे.

    आणि त्यामुळेच आज सर्व राज्य संघटना अखिल भारतीय शिक्षक संघाशी जुळवून घेतांना दिसत आहेत. त्यांची स्तुती करत आहेत. कारणही तसेच आहे.

*जिथे मोठ्या- मोठया नी पाठ फिरवली तिथे 25 ते 30 लक्ष रुपये खर्चून सर्व शिक्षकांसाठी टी ई टी विरुद्ध याचिका घालणारी* व *लढणारी एकमेव संघटना म्हणजे अखिल भरतीय प्राथमिक शिक्षक संघटना*.आणि पुढे याच याचिकेवर सर्व कायद्याची बाब सर्वांना लढविणे आहे.

आणि त्यामुळेच सर्व राज्यांना आता देश पातळी पासून ते जिल्ह्या पर्यंत एकच आशेचा किरण आहे.तो म्हणजे

*अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ*

 त्यामुळे सर्वांनी पुढील लढ्यासाठी *अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघांनी पुढील लढ्यासाठी जी हाक दिली त्या हाकेस आपला लढवय्या बाणा दाखवून व निराश न होता सोबत साथ द्यावी हिच नम्र विनंती*.


*शिक्षक हितासाठी सदैव सेवेत*


*अखिल महाराष्ट्र प्राथ शिक्षक संघ महाराष्ट्र*

     *सर्व सन्माननीय शिक्षक बंधू/भगिनींना विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक -हार्दिक शुभेच्छा!!*

  *अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ ...

   🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Friday, September 26, 2025

टिईटी TET exam प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल

 *संघ शक्ती युगे युगे!!*

*शिक्षक एकता जिंदाबाद...*

************************************

 *अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ*

*🟣टिईटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल*

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰


*नवी दिल्ली-देशातील प्राथमिक शिक्षकांना  (१ली ते ८वी) शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करणारा निकाल मा.सर्वोच्च न्यायालयाने १सप्टेंबर २०२५  निर्णयाने दिलेला आहे.यामुळे संपूर्ण शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली असून यामुळे देशभरातील लाखो शिक्षक प्रभावित झालेले आहे.*

*ज्यांची सेवा पाच वर्ष शिल्लक आहे त्यानांच फक्त सूट मिळाली असून बाकी शिक्षकांना दोन वर्षांत टिईटी करणे बंधनकारक केले आहे.*

 *🌀या विषयी अखेल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने मा.पंतप्रधान व मा.शिक्षणमंत्री यांना जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन देवून सदरील प्रकरणी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.तसेच लोकप्रतिनिधी यांना भेटुन निवेदन देण्यात येत आहेत.*


*🟣अखेर २५ सप्टेंबर पुर्वी याचिका दाखल-*

*सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एक महिन्याच्या आत रिव्हिव पिटीशन दाखल होणे आवश्यक असते त्यानुसार दि. २५ सप्टेंबर २०२५रोजी  अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने  मा.सर्वोच्च न्यायालयात "रिव्हिव पिटीशन" दाखल केली  आहे.यासाठी माजी अँटनी जनरल मुकुल रोहतगी तसेच माजी सॉलिसिटर जनरल मा.संतोष हेगडे हे ख्यातनाम वकील शिक्षकाची बाजू मांडणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष बसवराज गुर्रीकर तसेच राष्ट्रीय सचिव कमलाकांत त्रिपाठी यांनी सांगितले आहे.*


*🟣उत्तर प्रदेश शासनानंतर अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची  दुसरी याचिका मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे.यावरून अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ नेहमीच कठीण काळात शिक्षकांसोबत असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.*


*🟠राज्यातील शिक्षकांना आवाहन-*

*राज्यातील सर्व शिक्षकांना आवाहन करण्यात येते की आपण आपल्या नौकरी विषयी कोणतीही भिती बाळगू नये.शिक्षकांच्या  व शिक्षणाच्या न्याय मागणीसाठी आपले हक्क आबादीत ठेवण्यासाठी संघटना कायम आपल्या सोबत आहे.संघटीत व्हा ,संघटनेवर विश्वास ठेवा शिक्षकांच्या अस्तित्वाच्या लढाईत सहभागी व्हा!!*

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️


 *मा.दिपक भुजबळ महाराष्ट्र राज्य*उपाध्यक्ष तथा पुणे विभाग प्रमुख*

 .

 **मा संतोष लोहार राज्य संघटक* 


 *मा.गणेश जाधव अध्यक्ष**


**मा. विजयकुमार भुजबळ*  *सरचिटणीस**


 *मा.कृष्णत हिरवळे कार्याध्यक्ष* 


 *मा.रवींद्र लटिंगे** 

*मा.सुशांत येवले* ,

*मा.उद्धव पवार जिल्हा उपाध्यक्ष** 

आणि सर्व जिल्हा कार्यकारणी तालुका कार्यकारणी सदस्य..

🙏🙏



*अखिल सातारा प्राथमिक शिक्षक संघ*


Saturday, September 20, 2025

TET परीक्षा पुनर्विचार संदर्भात निवेदन सातारा जिल्हा

 




*टीईटी सक्तीबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा यासाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ सातारा शाखा यांचेवतीने  जिल्हाधिकारी सातारा मार्फत थेट पंतप्रधान यांना निवेदन.*


सर्वोच्च न्यायालयाने नुकताच प्राथमिक शिक्षकांच्या सेवा व पदोन्नतीसाठी टीईटी सक्तीचा निर्णय दिला आहे.सदरचा निर्णयावर देशभरातील शिक्षकांमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले.मात्र निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा असल्याने याबाबतीत अनेक संघटनांमध्ये मत भिन्नता दिसून येत आहे.सदरचा निर्णय व्यवहार्य नसल्याचे शिक्षक संघटनांचे मत आहे.याबाबत देशपातळीवर कार्यरत अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला आहे.या निर्णयामुळे प्राथमिक शिक्षकांच्या मनोबलावर विपरीत परिणाम होईल.एकूणच शैक्षणिक गुणवत्ता ढासळून शिक्षणव्यवस्था धोक्यात येण्याची भीती संघटनेमार्फत व्यक्त करण्यात येत आहे.आज देशभरातील सर्व जिल्ह्यात अखिल भारतीय संघटनेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.अखिल सातारा जिल्हा  प्राथमिक शिक्षक संघाचे नेते दीपक भुजबळ,अध्यक्ष गणेश जाधव, कार्याध्यक्ष कृष्णात हिरवळे. सरचिटणीस विजय भुजबळ,राज्य संघटक संतोष लोहार.सातारा तालुका अध्यक्ष बसवराज दोडमनी यावेळी निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.

TET संदर्भात निवेदन भंडारा जिल्हा..

 *अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचा देशव्यापी राज्या-राज्यातून लढा...........*



  *दिनांक -०१सप्टेंबर २०२५ रोजी मा.सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील प्राथमिक शिक्षकांना TETपरीक्षा सक्तीची केली असल्याचा निकाल दिला आहे.सदर निकालात हस्तक्षेप करून पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी विनंती करणारे पत्र देशाचे मा. पंतप्रधान,मा . शालेय शिक्षणमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना एकाच दिवशी प्रत्येक जिल्ह्याच्या मा. जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन देण्याचे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघा कडून नियोजन करण्यात आले.त्यानुसार अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने १९/२० सप्टेंबर यापैकी आपल्या स्तरावरून सोयीनुसार निवेदन द्यायचे ठरवले..अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाचे आव्हाना नुसार अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ भंडारा च्या वतीने आज दिनांक -२०/०९/२०२५ रोजी दुपारी २:०० वाजता भंडारा जिल्ह्याचे निवासी जिल्हाधिकारी माननीय लिना फलके मॅडम यांचेमार्फत टी ई टी रद्दबाबत भारताचे प्रधानमंत्री मा . नरेंद्र मोदी, शिक्षण मंत्री मा .धर्मेंद्र प्रधान  व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले.*

 *टीईटी असो किंवा जुनी पेन्शन केंद्रापासून ते जिल्ह्यापर्यंत लढणारी एकमेव संघटना म्हणजे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ. भविष्यातील आपल्या नोकरीवर येणारे संकट लक्षात घेऊन टी ई टी बाबत देशभर लढा सुरू केलेला आहे.*

  *भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना अशी आग्रहाची विनंती आहे की, आपणही अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वात एकसंघ होऊन हा लढा जोमाने लढूया परत एकदा नम्र विनंती करण्यात येते की, आपण आपल्याकडे येणाऱ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना योग्य ते सहकार्य करून संघटनेचे सभासद होण्यासाठी व लढ्यासाठी निस्वार्थपणे मदत करावी. आज टी ई टी आणि अशाच प्रकारची अनेक संकटे  ओळखून अनेक जिल्ह्यातील सर्व कर्मचारी व शिक्षक अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे नेतृत्वावर विश्वास घेऊन अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाशी जुडतांना दिसून येत आहेत. आपणही या लढ्यात एकजुटीने सहभागी व्हावे.हिच नम्र विनंती.*

    *यावेळी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे श्री.मनोहर कहालकर जिल्हाध्यक्ष, श्री.देवानंद दुबे जिल्हा सरचिटणीस, श्री.लोकेश गायकवाड राज्य हिशोबनिस,सौ.रोहीनीताई खोकले मॅडम महिला राज्यपदाधिकारी , श्री.नरेंद्रजी रामटेके सर , श्री.गणेशजी खोकले सर,श्री.लक्ष्मणजी ईश्वरकर सर, श्री.विजयभाऊ जाधव सर, श्री.किरणभाऊ मेश्राम सर, श्री.आशिषकुमार मेश्राम सर, श्री.रामभाऊ गेडाम सर, श्री.टेकरामजी झलके सर, श्री.सुखदेवे सर उपस्थित होते.*

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Wednesday, September 17, 2025

टिईटी प्रश्नी TET शासनाचे लक्ष वेधणार.

 



*🟣टिईटी प्रश्नी  शासनाचे लक्ष वेधणार....*

*🟠अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ देशाचे पंतप्रधान व शिक्षणमंत्री यांना देणार सामुहिक निवेदन...*

**************************************

 *शिक्षकांना नोकरीत सातत्य टिकविण्यासाठी व पदोन्नती साठी यापुढे टिईटी परिक्षा पास होणे अनिवार्य असणार आहे.१ सप्टेंबर रोजी मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे दुरगामी परीणाम शिक्षण क्षेत्रावर होणार आहेत.शिक्षकांना सक्तीने सेवानिवृत्त व्हावे लागणार आहे. यासाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने भारताचे मा. पंतप्रधान व मा.शिक्षणमंत्री यांना जिल्हाधिकारी मार्फत दि.१९/२० सप्टेंबर या दिवशी निवेदन देवून या प्रश्नी तोडगा काढण्याची विनंती करण्यात येणार आहे .*

*तसेच ३ ते १०आँक्टोबर या कालावधीत देशातील सर्व लोकसभा /राज्य सभा सदस्य यांना निवेदन देवून सन २०११ पुर्वी नियुक्त कोणत्याही शिक्षकांना टिईटी सक्ती करू नये या बाबत सुधारणा करणेबाबत विनंती करणार आहेत.अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ या निर्णयास स्थगिती मिळवण्यासाठी अथवा निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्यायालयीन लढा सुद्धा लढणार आहे. याबाबत अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री.बसवराज गुर्रीकर व महासचिव कमलाकांत त्रिपाठी यांनी पत्राद्वारे कळविले आहे.*


*यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या सर्व जिल्हा शाखांना कळविण्यात येते की, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या आवाहना नुसार दि.१९/२०सप्टेंबर २०२५ रोजी या  दिवशी  आपण जिल्हाधिकारी साहेब यांचे मार्फत मा.पंतप्रधान व मा.शिक्षणमंत्री यांना निवेदन द्यावे असे राज्य अध्यक्ष देविदास बस्वदे ,सरचिटणीस कल्याण लवांडे, सल्लागार-प्रकाश दळवी, सुरेश भावसार, विश्वनाथ सुर्यवंशी ,  कार्याध्यक्ष आण्णाजी आडे, वरीष्ठ उपाध्यक्ष किरण पाटील ,कोषाध्यक्ष- विनयश्री पेडणेकर* 

*विभाग प्रमुख-प्रमोद पाटील ,दीपक भुजबळ भगवान पाटील, दिगंबर जगताप ,सुनील हाके ,केशव बुरडे उपाध्यक्ष- म.ल .देसाई ,लालासाहेब मगर ,हरिदास घोगरे, अनिल महाजन ,शिवानंद सहारकर, विजय मनवर, परमेश्वर बालकुंदे, व्ही.डी. देशमुख,एफ आय बेग* *उपसरचिटणीस-महेश देशमुख, संध्या ठाकरे,*

*संयुक्त सचिव-रविंद्र काकडे,कृष्णा चिकणे,प्रशांत पारकर,सौ. माया चाफले, राजेंद्र निमसे,रमेश सुर्यवंशी,* 

*दिलीप देवकांबळे,सौ.संगीता पागृत,सौ. शुभांगी कचरे,विलास आळे, स्वप्नील राणे, किशोर मोहिते*

*संघटक- राजा कविटकर,सौ. पद्मशाली डी. एम. बाळासाहेब कदम,शांताराम पाटील, सौ. कांचन कडू,गुरुदास कुबल,जयवंत काळे,आशाताई झिल्पे, विजय पंडित,किशोर चौधरी, संतोष लोहार,सौ. ज्योती कुर्डूणकर,सौ. सविता पिसे*

*हिशोब तपासणीस :शिवाजीराव वाळके,लोकेश गायकवाड,*

*महिला विभाग प्रमुख : उर्मिला बोंडे,*

*संयोजिकाःरंजना केणी यांनी आवाहन केले आहे.*

Tuesday, June 3, 2025

वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षण संदर्भात अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ यांचे निवेदन..

 

वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षण संदर्भात अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ यांचे निवेदन..
 

टिईटी TET प्रश्नी जंतरमंतरवर 24नोव्हेंबर रोजी धरणे

 *🟡चलो दिल्ली....* *टिईटी प्रश्नी जंतरमंतरवर 24नोव्हेंबर रोजी धरणे....* *अखिल भारतीय  प्राथमिक शिक्षक संघाचा निर्णय....* ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️...